शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

मेघोली तलाव फुटला, शेतकरी उद्ध्वस्त -एका महिलेचा वाहून गेल्याने मृत्यू, परिसरातील शेतीचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी /शिवाजी सावंत मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू पाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) ला रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी /शिवाजी सावंत

मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू पाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) ला रात्री फुटल्याने परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. रात्री धरण फुटल्यानंतर पाण्यातून एक महिला आणि अकरा जनावरे बुडाली. पाण्याचा प्रवाह वेगवान आणि मोठ्या प्रमाणात असल्याने ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके आणि माती वाहून गेली आहेत. मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावांचे मोठं नुकसान झाले आहे.

सन १९९६ साली हे मातीचे धरण बांधण्यास सुरुवात झाली. तर २००० च्या दरम्यान या धरणात ९८ दशलक्ष घनफूट क्षमतेने पाणी साठवण्यात येऊ लागले. या धरणच्या बांधकामासाठी ४ कोटी ७० लाख रुपये खर्च आलेला आहे. धरणाच्या आऊटलेट जवळ पायथ्यालाच या धरणाच्या भिंतीतून सुरुवातीपासून गळती लागलेली होती. याबाबत अनेकवेळा शेतकऱ्यांनी तर गतवर्षी आमदार प्रकाश आबिटकर, माजी सभापती बाबा नांदेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन गळतीची पाहणी करून दुरुस्तीचा प्रस्ताव नाशिक येथे पाठविण्यात आला होता. दुरुस्तीसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. या धरणावर असलेल्या रक्षकाची बदली अन्य ठिकाणी केल्याने रात्री धरण फुटल्याचे स्थानिक लोकांच्याकडून प्रशासनाला समजले.

बुधवारी रात्री धरण फुटल्याचे समजताच लोकांनी धरणस्थळाकडे धाव घेतली. अंधारात बॅटरीच्या उजेडात लोकांना पाण्याचा प्रवाह पाहून काळजात धस्स झाले. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. जवळच्या गावांना सतर्क राहण्यासाठी फोन केले जाऊ लागले.

या पाण्यातून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते (वय ५५) या महिला वाहून गेल्या. ही महिला व पती, मुलगा, नातू आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. काही जनावरे सोडली. पाणी अचानक वाढल्याने अंधारातून पाण्याबरोबर सर्व जण वाहून गेले; परंतु पती व मुलगा नातू एका झाडाला धरून बसले व कसेबसे बाहेर आले. परंतु आपली आई वाहून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. ग्रामस्थही मदतीला धावले. त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडला.

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरे कोसळली, मोटारसायकली वाहून गेल्या, विजेचे खांब उखडून गेले आहेत. तलावापासून शेळोलीपर्यंतच्या शेकडो एकरांवरील पिके वाया गेली आहेत. जमिनीला बांध शिल्लक राहिले नाहीत. सगळीकडे दगडगोटे पसरले आहेत. प्रशासनातील सर्व अधिकार, पदाधिकारी रात्री रात्रभर घटनास्थळी बसून होते.