शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली मेख

By admin | Updated: July 6, 2015 00:28 IST

मच्छिंद्र सकटे : दलित महासंघाचा मेळाव्यात मोदी, फडणवीस सरकारवर टीका

कोल्हापूर : ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’च्या नावाखाली मोदी आणि फडणवीस सरकारने गोरगरिबांच्या हितालाच मेख मारली आहे. आज हिंदू राष्ट्रवादामुळे शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मागे पडले आहेत. दलितांवरील अत्याचार वाढल्यामुळे हिंदू राष्ट्रवादाला रोखण्यासाठी दलित महासंघाने तीव्र संघर्षाचा निर्धार केल्याचे महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले.दलित महासंघाच्या २४ व्या वर्धापनदिनी रविवारी येथील शाहू स्मारक भवनात निर्धार मेळाव्यात अध्यक्षस्थावरून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी भटक्या-विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने उपस्थित होते.डॉ. सकटे म्हणाले, आरएसएस आजही आपले कर्मठ विचार सोडायला तयार नाही. स्वत:मध्ये बदल घडवून न आणणाऱ्यांचे सरकार देशामध्ये कसे बदल घडविणार? गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे गोरगरिबांचे आर्थिक नुकसान होत आहे. मराठ्यांना व मुस्लिमांना आरक्षणापासून डावलले जात आहे; पण याविरोधात कुणीच काही बोलत नाहीत. पूर्वी लोक अडाणी, अंधश्रद्धाळू व गरीब होते; पण ते नेता चांगला निवडत होते. आज लोक सुशिक्षित झाले पण नेता अडाणी, अशी परिस्थिती आहे. शाहू-फुले-आंबेडकर आणि अण्णा भाऊंचे विचार ही आमची शिदोरी असल्याचे डॉ. सकटे यांनी सांगितले.लक्ष्मण माने म्हणाले, गरीबांच्या संघटना बांधणे आज कठीण झाले आहे. कार्यकर्तेच दलाल झाल्यामुळे पुरोगामी चळवळ धोक्यात आहे. आमिषापोटी तरुणांना वेगळ्या वाटेवर नेले जात आहे. हे रोखण्यासाठी तरुणांना चळवळीत संधी दिली पाहिजे. दलित संघटनांनी भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवरही लढावे. प्रतिगामी शक्तींची सत्ता केंद्रात असल्यामुळे पुरोगामी गटातील सर्व जातिसमूहांनी एकत्रित येऊन लढा उभारला तरच टिकाव लागणार आहे. डॉ. गुरव म्हणाले, आपण अहंकार सोडत नाही तोपर्यंत जातिव्यवस्था तशीच राहील. जातियवादी ‘आरएसएस’चा लोकशाही मार्गाने पराभव करण्यासाठी पुढे या. सर्वजण एकत्र आले तर या प्रतिगाम्यांची सत्ता उलथवून टाकणे अशक्य नाही. दारिद्र्य, विषमता, अंधश्रद्धा, अनारोग्य, व्यसन संपले तरच बहुजनांची प्रगती होईल. जिल्हाध्यक्ष लालासो नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दबडे, बाबूराव आयवाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पुष्पलता सकटे, अनिल मिसाळ, अजित भोरे, सुरेश महापुरे, आदी उपस्थित होते. प्रा. अमोल महापुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आठवले यांच्याकडून दलित कविता बदनाम दलित कविता रामदास आठवलेंनी बदनाम केली. ल ला ल आणि ट ला ट जुळवून संसदेत कविता करण्याची काय गरज आहे? अशा वृत्तीमुळे आंबेडकरी चळवळ पुढे जाणार नाही. आंबेडकरवादी चळवळीत काम करताना अशा पद्धतीने व्यक्त होणे चुकीचे आहे, अशी टीका लक्ष्मण माने यांनी केली.गुडसा आंदोलन गोवंश हत्याबंदी कायदा करून फडणवीस सरकारने गोरगरिबांच्या तोंडचा घासच काढून घेतला आहे. याला विरोध करण्यासाठी दलित महासंघातर्फे गुडसा आंदोलन करण्याचा इशाराही डॉ. सकटे यांनी दिला.