शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा फार्स: ‘नमामि पंचगंगा’, निधी नाही, नुसताच दंगा

By समीर देशपांडे | Updated: May 3, 2025 12:06 IST

उपाययोजना जुन्याच, शासन आदेश फक्त नवा

समीर देशपांडेकोल्हापूर : गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पंचगंगा शुद्धीकरणाची मागणी होत असताना, आता महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांत नदी शुद्ध करण्याचे आव्हान पेलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘नमामि पंचगंगा’ नदी कृती आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मान्यता दिली आहे. परंतु, यासाठी कोणताही स्वतंत्र निधी जाहीर करण्यात आला नसून, नियमित पद्धतीनेच कामकाज करण्याबाबतचा शासन आदेश बुधवारी काढण्यात आला आहे. याचाच अर्थ ‘नमामि पंचगंगा’ म्हणजे निधी नसतानाचा नुसता दंगा चालला आहे.

कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या पाच नद्यांची ही पंचगंगा कोल्हापूरपासून नृसिंहवाडीपर्यंत ६७ किलोमीटर वाहते. नदीकाठावरील कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेतील सांडपाणी, चार नगर परिषदा, नगरपंचायतींमधील आणि नदीकाठावरील १७४ गावांतून बाहेर पडणारे सांडपाणी घेऊन वाहत असते. काठावरील साखर कारखाने, इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगातील रसायनमिश्रित पाणी यामुळे रसायनांमुळे फेसाळणारी ही पंचगंगा विषगंगा बनल्याने दरवर्षी लाखो मासे मृत होत असल्याचे वास्तव आहे.या पार्श्वभूमीवर ‘नमामि गंगा’च्या पार्श्वभूमीवर ‘नमामि पंचगंगा’ योजना राबविण्याची मागणी होत होती. त्यानुसार हा शासन आदेश काढण्यात आला आहे. यासाठी व्यापक कृती आराखडा राबविण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया सुधारणा, औद्योगिक सांडपाणी नियंत्रण, कचरा व्यवस्थापन सुधारणा व अनुषंगिक उपाययोजना करावयाच्या असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या या आराखड्यास शासनाने मान्यता दिली असून, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणांनी ही अंमलबजावणी करावी, यासाठी या सर्व संस्थांना हा आराखडा पाठवण्यात येणार आहे. या सर्व उपायोजनांची अंमलबजावणी प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाची आहे.

प्रस्ताव पाठवायचा, निधी मागायचाया आराखड्याच्या अंमलबजावणीला मान्यता देत असताना, यासाठी कोणताही स्वतंत्र निधी जाहीर करण्यात आलेला नाही. संबंधित विभागांनी आपापल्या विभागांकडे प्रस्ताव पाठवून निधी मंजूर करून घ्यायचा आहे, तसेच सामाजिक दायित्व आणि पर्यावरण दायित्व या विविध कंपन्यांकडील निधीचाही वापर या कामांसाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ही हिंमत सरकार दाखवणार कायया पंचगंगेच्या काठावर ८ साखर कारखाने आहेत. १०७ उद्योगधंदे आहेत. त्यातील रसायनयुक्त सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते. ते रोखण्याची हिंमत शासन दाखवणार का, हाच खरा प्रश्न आहे. याआधीच जर या कारखान्यांवर खरोखरची कारवाई केली असती, तर पंचगंगा इतकी प्रदूषितच झाली नसती.

८५ एमएलडी पाणी प्रक्रियेविना नदीतस्थानिक स्वराज्य संस्था - निर्माण होणारे सांडपाणी  - एमएलडी प्रक्रिया क्षमता

  • कोल्हापूर महापालिका - १४९.१/१०६.७
  • इचलकरंजी महापालिका - ४०/२०
  • अन्य गावे  - १९.६९/००

कोणताही आमूलाग्र बदल नाहीजरी या आराखड्याच्या अंमलबजावणीला मान्यता दिली असली, तरी ना कोणता निधी ना कोणते अधिकार. पूर्वीप्रमाणेच विभागीय आयुक्तांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे वरिष्ठ अधिकारी बैठका घेणार प्रस्ताव सादर होणार. जोपर्यंत युद्धपातळीवर हे काम सुरू करून यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद होत नाही, तोपर्यंत पंचगंगेच्या स्थितीत सुधारणा होईल, असे वाटत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणGovernmentसरकार