शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

महापौरपदाचा ‘लोभ’स काटेरी मुकुट!

By admin | Updated: November 16, 2015 00:44 IST

महापालिकेचे राजरंग : महापौरपदाची खांडोळी; माळवी प्रकरणाने बदनामी

तानाजी पोवार --कोल्हापूर महानगरपालिकेत एकदा महापौर झाल्यानंतर पुन्हा त्यांना नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी जनतेनेच नाकारले आहे. त्याला फक्त कांचन कवाळे याच अपवाद आहेत. याचाच अर्थ असा की, महापौर म्हणजे महानगरपालिकेच्या राजकारणातून निवृत्ती घेतल्याचा प्रकार आहे. याशिवाय तीन महिन्यांचा महापौर व तृप्ती माळवी लाच प्रकरणाने महानगरपालिकेची बदनामी झाली असल्याचेही नमूद करावे लागेल. हे पद म्हणजे काटेरी मुकुटच आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४२व्या महापौरपदासाठी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांची निवड निश्चित आहे. भाजप-ताराराणी आघाडी विरोधी बाकांवर बसण्यास तयार असली, तरीही त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटांतील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता कायम आहे. आज, सोमवारी या निवडीवर शिक्कामोर्तब होत आहे.विधानसभेची अधुरी स्वप्नेमहापौरपदानंतर विधानसभा हेच प्रत्येकाचे स्वप्न असते. अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. शामराव शिंदे, आर. के. पोवार या माजी महापौरांसह नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी विधानसभेच्या निवडणुका लढविल्या; पण त्यांना निराशाच प्राप्त झाली. १९८९ मध्ये रामभाऊ फाळके यांनी शहराच्या पाणीप्रश्नासाठी महापौरपदाचा मुदतपूर्व राजीनामा दिला. त्यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढविली. पहिल्या महिला महापौरमहिला आरक्षण आल्यानंतर पहिल्या महिला महापौरपदाचा मान हा १९९४ मध्ये जयश्री बबेराव जाधव यांनी मिळविला. तत्पूर्वी पहिल्या महिला उपमहापौरपदाचा मान अ‍ॅड. मालती आनंदराव हळदकर यांनी १९९० मध्ये मिळविला. अल्पसंख्याक व दलित महापौर‘बिनआवाजाचा बॉम्ब फुटणार’ अशी घोषणा करून १९९८ मध्ये महादेवराव महाडिकांच्या ताराराणी आघाडीविरोधात शिवसेनेच्या साथीने गनिमी कावा करून बाबू फरास यांनी सुरुंग लावला. अल्पमतातील कांचन कवाळे महापौर झाल्या. पुढील वर्षी स्वत: बाबू फरास हे महापौर बनले. तत्पूर्वी १९९० मध्ये रघुनाथ बावडेकर यांना महापौरपदाची संंधी देऊन दलित समाजाला मान दिला.पती-पत्नी, पिता-पुत्रमहापौर-उपमहापौरसन १९९२-९३ मध्ये बंडोपंत नाईकवडे महापौर, तर त्यांच्या पत्नी सुलोचना नाईकवडे उपमहापौरपदी एकाच वेळी विराजमान झाल्याची ही एकमेव घटना आहे. १९८० मध्ये दत्तात्रय कणेरकर यांना महापौरपद, तर त्यांचे पुत्र शिरीष कणेरकर यांना २०११ मध्ये हेच पद मिळाले. १९८५ मध्ये धोंडिराम रेडेकर यांना महापौरपद, तर त्यांच्या पत्नी सुशीला रेडेकर यांना १९९९ ला उपमहापौरपद मिळाले. कांचन कवाळे (१९९८) व त्यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे (२०११) यांनीही महापौरपद मिळाले. तसेच जयश्री सोनवणे यांनी २०१३ मध्ये महापौरपदावर काम केले. त्यांचे पती हरिदास सोनवणे (२००३), सासरे रामकृष्ण सोनवणे (१९८८) यांनी उपमहापौरपदावर काम केले आहे.पती-पत्नी, पिता-पुत्रमहापौर-उपमहापौरसन १९९२-९३ मध्ये बंडोपंत नाईकवडे महापौर, तर त्यांच्या पत्नी सुलोचना नाईकवडे उपमहापौरपदी एकाच वेळी विराजमान झाल्याची ही एकमेव घटना आहे. १९८० मध्ये दत्तात्रय कणेरकर यांना महापौरपद, तर त्यांचे पुत्र शिरीष कणेरकर यांना २०११ मध्ये हेच पद मिळाले. १९८५ मध्ये धोंडिराम रेडेकर यांना महापौरपद, तर त्यांच्या पत्नी सुशीला रेडेकर यांना १९९९ ला उपमहापौरपद मिळाले. कांचन कवाळे (१९९८) व त्यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे (२०११) यांनीही महापौरपद मिळाले. तसेच जयश्री सोनवणे यांनी २०१३ मध्ये महापौरपदावर काम केले. त्यांचे पती हरिदास सोनवणे (२००३), सासरे रामकृष्ण सोनवणे (१९८८) यांनी उपमहापौरपदावर काम केले आहे.घरात दोन नगरसेवकपदेबंडोपंत नाईकवडे आणि त्यांच्या पत्नी सुलोचना नाईकवडे, कांचन कवाळे यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे, प्रकाश नाईकनवरे व त्यांच्या पत्नी प्रतिभा नाईकनवरे, किरण दरवान व त्यांच्या बहीण अलका जाधव यांनी एकाच सभागृहात कामकाज केले आहे.महापौर, उपमहापौर सुविधामहापौरपदासाठी प्रथम नागरिक म्हणून मानाचे स्थान, स्वतंत्र गाडी, स्वतंत्र कक्ष, सभागृहातील कामकाज चालविण्याचा अधिकार, नगरसेवकपदापेक्षा दुप्पट मानधन असते. उपमहापौरपद हे महापौरपदाच्या गैरहजेरीत सभागृह चालविण्यासाठी सोयीचे निर्माण केले आहे; पण अनेकवेळा त्यांना सभागृह चालविण्याचा मान मिळत नसल्याने त्यावर ‘शोभेचे बाहुले’ म्हणून टीका होते. या पदासाठी स्वतंत्र गाडी, स्वतंत्र कक्ष इतक्याच सुविधा मिळतात.पदाची उंची वाढविणारे पहिले महापौरबाबासाहेब जाधव (कै.) बाबासाहेब जाधव (कसबेकर) यांना पहिले महापौर होण्याचा मान १९७८ मध्ये मिळाला. एक वर्षाच्या कार्यकालमध्ये महापौरपदाची उंची ही खुर्चीमुळे नव्हे तर माणसामुळे वाढते, हे त्यांनी दाखवून दिले. शिवाजी विद्यापीठात पदवीदान समारंभावेळी त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचे मानाचे स्थान न दिल्याने त्यांनी ४१ नगरसेवकांसह समारंभावर बहिष्कार घातल्याने शहरात गदारोळ माजला. त्यावेळी तत्कालीन कुलगुरूंनी जाहीर माफी मागितल्यामुळे विषयावर पडदा पडला. गाजलेली लढतसन १९९० मध्ये शिवाजी पेठेतून भिकशेठ पाटील आणि शिवाजीराव चव्हाण यांच्यातील नगरसेवक पदाची निवडणूक आजही कोल्हापूरकरांच्या स्मरणात आहे. या चुरशीच्या लढतीत नागरिकांनी सामान्य कुटुंबातील भिकशेठ पाटील यांना ११ मतांनी विजयी केले. ही पराभवाची सल काढण्यासाठी चव्हाण यांचे चिरंजीव अजिंक्य चव्हाण यांना विजयी करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले. महापौरपदाची खांडोळीमहापौरपदासाठी नाव सुचविताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नेत्यांनी आपली राजकीय खुर्ची सांभाळण्यासाठी या महापौरपदाची खांडोळी करून अनेकांचे समाधान केले. त्यामध्ये शिरीष कणेरकर यांना सहा महिने, भीमराव पोवार आणि दीपक जाधव यांना प्रत्येकी चार महिने, तर दिलीप मगदूम आणि बाजीराव चव्हाण यांना प्रत्येकी अडीच महिने कालावधी मिळाला; पण या पदाच्या खांडोळ्यांमुळे महाराष्ट्रभर कोल्हापूर महापालिकेची बदनामी झाली. सर्वांत जास्त कालावधी खराडे यांना मिळाला. पंचवार्षिक निवडणुका झाल्यानंतर पक्षातील राजकारणाचा फायदा उठवत सई इंद्रनील खराडे यांनी नोव्हेंबर २००५ ते मे २००८ हा अडीच वर्षांचा महापौरपदाचा कालावधी पूर्ण मिळविला.