शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’चा अखेर बाजारच

By admin | Updated: August 1, 2015 00:55 IST

जिल्हा बँकेचा निर्णय : नरसिंग पाटील यांच्याशी चर्चा करून निविदा

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यांचा लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते. कारखान्याचे माजी अध्यक्ष नरसिंग पाटील यांच्याशी चर्चा करून येत्या तीन-चार दिवसांत विक्रीची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेने आतापर्यंत पाचवेळा निविदा मागविल्या होत्या पण कोणाचाही प्रतिसाद न मिळाल्याने कारखान्याची विक्रीच करावी लागणार होती पण विक्री न करता भाडेतत्त्वावरच चालविण्यास द्यावा, अशी मागणी नरसिंग पाटील यांच्यासह शेतकऱ्यांची होती. कारखान्यावर विविध वित्तीय संस्थांचे तब्बल ३५० कोटींचे कर्ज आहे. हा कर्जाचा डोंगर पाहता एवढी रक्कम उपलब्ध करणे आवाक्याबाहेरच आहे तरीही जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने ३१ जुलैपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. या वेळेत कर्जाची रक्कम भरता न आल्याने पुन्हा एक महिन्याची मुदत नरसिंग पाटील यांनी बँकेकडे मागितली होती. एकतर कारखाना गेले चार वर्षे बंद आहे, कारखाना जरी जिल्हा बँकेच्या ताब्यात असला तरी काही मशिनरीची चोरी झालेली आहे, तर काही गंजलेली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यास कोणी पुढे येत नाही. कारखान्याकडील थकबाकी वसूल झाल्याशिवाय बँक सावरू शकत नाही. त्यामुळे बँकेच्या शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन कारखाना विक्रीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नरसिंग पाटील यांच्याशी चर्चा करून येत्या तीन-चार दिवसांत विक्रीची निविदा काढण्यात येणार असून निविदेचे सर्वाधिक अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, अशोक चराटी, उदयानी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कारखाना चार वर्षे बंद असल्याने शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथील शेतकरी व ज्येष्ठ नेते नरसिंग पाटील यांच्या भावनेचा विचार करून कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न केला. पाचवेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने बॅँकेला विक्रीचे पाऊल उचलावे लागत आहे. हे पैसे वसूल झाले नाहीतर बॅँकेचा परवाना धोक्यात येणार आहे.- आमदार हसन मुश्रीफ(अध्यक्ष, जिल्हा बॅँक) आतापर्यंत कारखान्यांचे तीनवेळा मूल्यांकन झाले आहे. त्यामध्ये ‘नाबार्ड’च्या मूल्यांकनानुसार सर्व मालमत्तेचे २२० कोटी मूल्यांकन करण्यात आले आहे. तीच विक्रीमध्ये किमान किंमत (अपसेट प्राईज) धरली जाणार आहे.