शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतीत विरोधकांची विधाने प्रक्षोभक व बेजबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:51 IST

Maratha Reservation : मराठा समाजाच्या भावना लवकरात लवकर शासनापर्यंत पोहचाव्यात म्हणून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी रास्ता रोकोचे आंदोलन केले, पण मोर्चात सहभागी झालेल्या ठरावीक संघटना व विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक व बेजबाबदार विधाने केली.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाबाबतीत विरोधकांची विधाने प्रक्षोभक व बेजबाबदारसुजित चव्हाण यांचे स्पष्टीकरण : समितीतील काहींना दिला घरचा आहेर

कोल्हापूर : मराठा समाजाच्या भावना लवकरात लवकर शासनापर्यंत पोहचाव्यात म्हणून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी रास्ता रोकोचे आंदोलन केले, पण मोर्चात सहभागी झालेल्या ठरावीक संघटना व विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक व बेजबाबदार विधाने केली.

वास्तविक महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या बाबतीत आश्वासक पाऊले उचलत असताना आंदोलनादरम्यान ते कसे उदासीन आहे, हे दाखवण्याची ठरावीक पक्ष व संघटनांनी केलेली कृती चुकीची आहे, याचा आम्ही निषेध करतो, राज्य सरकारबरोबर समन्वय ठेवूनच हा प्रश्न सुटेल यासाठी आम्ही आग्रही आहोत, असे स्पष्टीकरण सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.मराठा आरक्षण लढाई लढण्यासाठी स्थापन झालेल्या या समितीत भाजपला पूरक भूमिका घेणारे कार्यकर्तेही आहेत. त्यांनी मोर्चावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याने चव्हाण यांनी हे स्पष्टीकरण करून खासदार संभाजीराजे व राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

पत्रकात ते म्हणतात, खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची घोषणा करुन सरकारशी समन्वयाची भूमिका राखण्याचा प्रयत्न केला. उपद्रवी लोकांच्या चिथावणीखोर वक्तव्याने आंदोलनाला गालबोट लागू नये हाच त्या मागचा उद्देश होता. राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत, तेवढ्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पाऊले उचलली आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात लक्ष घालत आहेत. तरीदेखील या प्रक्रियांना अधिक गती यावी म्हणून रास्ता रोकोचे आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरले.

तथापि तेथे सरकार विरोधी केलेली वक्तव्ये आम्हाला पटलेली नाहीत, ती सरकारवर अविश्वास दाखवणारी व लढ्याचे बळ कमी करणारी असल्याचे लक्षात आल्यानंतरच आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत. त्यानुसार येथून पुढे देखील सरकारच्या भूमिकेशी सहमत राहून समन्वयाने आणि योग्य संपर्क ठेवूनच हा प्रश्न सुटेल. हे सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देईल.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर