शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

सीमावासीयांनाही मराठा आरक्षणाची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:48 IST

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क म्हाकवे : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले आहे. आता ...

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले आहे. आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांतील लोकांनाही अशा आरक्षणाचा लाभ कधी मिळणार, याकडे या गावांचे डोळे लागले आहेत. सध्या, या सीमावर्ती भागातील तरुणांना इतर मागास, मागासवर्गीय, अनुसूचित जाती यामध्ये आरक्षणाचा लाभ दिला जातो.सीमाभागातील हजारो तरुण कोल्हापुरातील मराठा मोर्चात पाठिंबा देत सहभागी झाले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादात येथील नागरिकांना अन्याय सहन करावा लागत आहे. कर्नाटक राज्याची निर्मितीही महाराष्ट्राच्या अगोदर झाली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उत्तरेकडील बेळगाव, कारवार यासह चार जिल्ह्यांतील ८६५ गावे कर्नाटकात समाविष्ट करण्यात आली; परंतु येथील नागरिकांना महाराष्ट्रात समाविष्ट होण्याची इच्छा असून हे नागरिक वारंवार मोर्चे, आंदोलनासह न्यायालयीन लढाई करत आहेत.हा सीमावाद गेल्या १४ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र, यासाठी कर्नाटक सरकार आपली बाजू सक्षमपणे मांडत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न होत नसल्याबाबत सीमावासीयांतून नाराजी व्यक्त होत आहे.....तर इकडे आड तिकडे विहीरया चार जिल्ह्यांतील ८६५ गावांतील सुमारे ४० लाख नागरिक महाराष्ट्रात जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारकडून त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत आला आहे. या सरकारने सुविधा देण्याबाबत त्यांच्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही यांना वंचित ठेवले, तर या नागरिकांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशीच होणार असल्याची भावना सीमावासीयांची झाली आहे.याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीचे निपाणी अध्यक्ष जयराम मिरजकर, महाराष्ट्र सरकारकडूनच आम्हा सीमावासीयांना अपेक्षा आहेत. आमच्याकडे दुर्लक्ष न करता आरक्षणासह सर्व सेवासुविधांमध्ये आमचाही सहभाग करून घ्यावा. यासाठी मराठी भाषिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सीमाभागाचे समन्वयक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आदींची लवकरच भेट घेणार आहोत.सीमावर्तीय प्रमाणपत्रदेण्यास प्रारंभ...तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००८ मध्ये या सीमाभागातील नागरिकांकडे सीमावर्तीय (बोर्डर) प्रमाणपत्र असेल, तर त्यांना शिक्षणासह पोलीस, सैन्य यांसह शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, क न्नडधार्जिण्या सरकारने गेल्या दोन वर्षांपासून हे प्रमाणपत्र देणे बंद केले होते. त्यामुळे येथील नागरिकांची कुचंबणा होत होती. याबाबत सीमावासीयांतून संतापाची लाट उसळली होती. सध्या ते दिले जात असल्याचे येथील तरुण सांगत आहेत.१५ साहित्य संमेलने आणि मराठीचा जागरसीमाभागातील या गावामध्ये दरवर्षी १५हून अधिक मराठी साहित्य संमेलने भरविली जातात. या माध्यमातून या परिसरात मराठीचा जोरदार जागर केला जातो. किंबहुना अभ्यासक्रमातील मराठीच्या चुकांबाबत कर्नाटकात मोर्चे, आंदोलने होऊन त्यामध्ये सरकारला बदल करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नेहमीच सीमावासीयांचा सकारात्मक विचार करावा, अशी माफक अपेक्षाही व्यक्त होत आहे.