शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

हिप्परगी बंधारा, अलमट्टीमधील पाणीसाठा निकषानुसार ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 21:26 IST

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक

इंदुमती सूर्यवंशी ,लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : हिप्परगी बंधारा तसेच अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने घालून दिलेल्या निकषाचे पालन न करता जास्तीत जास्त पाणीसाठा ठेवल्याने कोल्हापूर व सांगलीला महापुराचा फटका बसतो. हे टाळण्यासाठी कर्नाटकमधील या दोन्ही महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठ्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे, त्यावर महाराष्ट्राचे संनियंत्रण असावेत, पावसाळ्यात सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने खुले करावेत, कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना करावी अशी मागणी सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने जिल्हधिकारी अमोल येडगे यांच्याकडे शुक्रवारी केली.

समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, सुयोग हावळ, संजय कोरे यांच्या शिष्टमंडळाने याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करावा, त्यानुसार पाणीसाठ्याचे नियोजन करावे, त्यासाठी कर्नाटक पाटबंधारे विभागाशी चर्चा करावी असा सूचना कोल्हापूर पाटबंधारे विभागाला दिल्या.

समितीने पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील बरगे, दारे तळातून पूर्ण क्षमतेने खुले करून नदीला मोकळे वाहू द्यावे. महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये समन्वय असावा, कृष्णा खोरेचे भाग असलेल्या सर्व राज्यांची केंद्रीय प्रतिनिधित्व असलेलेली कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना व्हावी. पाणीसाठ्यावर आंतरराज्यीय बैठका व्हाव्यात. राजापूर बंधाऱ्यावरून जाणारा विसर्ग अलमट्टी धरणातून खाली सोडावा, कर्नाटककडून हे होत नसल्याने कृष्णा नदीच्या पूर वहन क्षमतेत मानवनिर्मित अडथळे येऊन पाण्याला फुगवटा येतो व महापुराची स्थिती होते असे मत नोंदवले. यावेळी धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, महेश जाधव, एकनाथ माने, महादेव काळे आदी उपस्थित होते.-

हिप्परगी बंधाऱ्याचा परिणामजमखंडी (ता. बागलकोट) येथील हिप्परगी जलसिंचन प्रकल्पात ६ टीएमसी जलसाठा होतो. त्याची पूर्ण क्षमतेची पातळी ५२४.२७ मीटर असून त्यात ५३१.४० मीटर पाणी साठा करू शकतात. महाराष्ट्रातील शेवटचा राजापूर बंधारा हिप्परगीपासून ९२ किलोमीटरवर असून त्याची उंची ५२३.५० मीटर व नदी पात्राची उंची ५१८.९७ मीटर आहे. हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी १ जुलै आल्यावरदेखील सोडले जात नाही, त्यामुळे कोल्हापूर पद्धतीचा शिरोळ बंधारा भरून तेरवाड बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाणी थांबते त्यामुळे पंचगंगेच्या वरच्या भागात राजाराम बंधाऱ्यापर्यंत पाण्याला फुग येते.

--केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार अलमट्टी धरणातील अपेक्षित पाणीसाठा

१ जून ते १५ जून : ५०८.२२ मीटर१६ जून ते ३० जून : ५१३.६ मीटर

१ जुलै ते १५ जुलै : ५१७.११ मीटर१६ जुलै ते ३० जुलै : ५१३.६० मीटर

३० ऑगस्ट : ५१७ मीटर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर