शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

मेघोली तलाव फुटून कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी /शिवाजी सावंत मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) रात्री साडेदहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी /शिवाजी सावंत

मेघोली (ता. भुदरगड) येथील लघुपाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) रात्री साडेदहा वाजता फुटला. तलावाच्या पायथ्याशी असलेल्या गळतीमुळे हा मातीचा तलाव फुटला. यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके आणि माती वाहून गेली आहे. मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ, तळकरवाडी या गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हा तलाव रात्री फुटल्यामुळे अल्प प्रमाणात जीवितहानी झाली. जर तलाव दिवसा फुटला असता तर शेतात काम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असता. अवघ्या अडीच तासांत हा तलाव रिकामा झाला.

१९९६ साली हा मातीचा लघुपाटबंधारे तलाव बांधण्यास सुरुवात झाली, तर २००० च्या दरम्यान या धरणात ९८ दशलक्ष घनफूट क्षमतेने पाणी साठवण्यात येऊ लागले. या तलावाच्या बांधकामासाठी ८ कोटी ७० लाख रुपये खर्च आलेला आहे. या तलावामुळे मेघोली, सोनुर्ली, नवले, वेंगरुळ, तळकरवाडी या गावांतील ५०० हेक्टर जमिनी ओलिताखाली आल्या. या गावांसाठी हे तलाव म्हणजे जीवनदायी ठरले होते. पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला होता.

तलावाच्या पायथ्यालाच असलेल्या आऊटलेटजवळच्या भिंतीतून सुरुवातीपासून गळती लागलेली होती. याबाबत अनेकवेळा शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तत्कालीन सभापती कीर्ती देसाई यांनी पंचायत समितीच्या बैठकीत अनेकवेळा हा प्रश्न उचलून धरला होता, तर गतवर्षी आमदार प्रकाश आबिटकर, माजी सभापती बाबा नांदेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन गळतीची पाहणी करून दुरुस्तीचा प्रस्ताव नाशिक येथे पाठविण्यात आला होता. तरीदेखील दुरुस्तीसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. गळतीच्या ठिकाणी सिमेंटच्या गोणीत वाळू भरून गळती थांबविण्यासाठी केविलवाणी धडपड प्रशासन करीत होते.

याचा परिणाम व्हायचा तो झाला. बुधवारी रात्री झोपेत असलेल्या या भागातील लोकांना हा हा म्हणता तलाव फुटल्याची बातमी समजली. घटना समजताच लोकांनी धरणस्थळ आणि ओढ्याकडे धाव घेतली. सगळीकडे अंदाधुंदी सुरू झाली. काळाकुट्ट अंधारात बॅटरीच्या उजेडात पाण्याचा प्रपात आणि आक्राळविक्राळ रूप पाहून उपस्थितांच्या काळजात धस्स झाले. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. जवळच्या गावांना सतर्क राहण्यासाठी फोन केले जाऊ लागले, तर उन्हाळ्यात पिण्यासाठी आणि शेतीला पाणी मिळणार नाही या धास्तीने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. आजही ही गावे या धक्क्यातून सावरलेली नाहीत. येत्या उन्हाळ्यात मेघोली, वेंगरुळ, नवले, सोनुर्ली, तळकरवाडी या गावांतील पिके आणि ग्रामस्थ पाण्यावाचून धोक्यात सापडणार आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार अश्विनी अडसुळ यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी करून सूचना केल्या, तर राहुल देसाई, अर्जुन आबिटकर, बाबा नांदेकर आणि प्रशासनातील सर्व अधिकारी, पदाधिकारी रात्री रात्रभर घटनास्थळी उपस्थित होते.

सुरक्षारक्षकही नाही

या धरणावर असलेल्या रक्षकाची बदली अन्य ठिकाणी केल्याने रात्री धरण फुटल्याचे स्थानिक लोकांच्याकडून प्रशासनाला समजले. बुधवारी रात्री कोंडुशी येथील काही तरुण जेवण करण्यासाठी तलावावर गेले होते. त्यावेळी जोरात आवाज ऐकू आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, धरण फुटले. त्यांनी त्या गावातील तुकाराम देसाई यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी लगेच गावातील लोकांना फोनवरून माहिती दिली व अनेकजण सतर्क झाले. यामुळे मोठा अनर्थ टळला.