शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 6:18 PM

क्षेत्रीय स्तरावर मंडल अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी. तिच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

ठळक मुद्देक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनमहिला अधिकाऱ्यांनी ओळख निर्माण करावी : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : क्षेत्रीय स्तरावर मंडल अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी. तिच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी  देसाई म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनी सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनविले. याच क्रांतीज्योतीने स्त्रियांना शिक्षीत केले. खचलेल्या स्त्रियांना शिक्षणाच्या मार्गातून पुढे आणले. सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत.

ज्या महिला अधिकाऱ्यांची पदोन्नती होत आहे, अशा महिला अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर मंडल अधिकारी म्हणून सक्षमपणे काम करावे आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी. हीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. त्यासाठी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा.यावेळी अव्वल कारकून अश्विनी कारंडे, सामान्य प्रशासन शाखेचे संभाजी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, तहसिलदार अर्चना शेटे, रंजना बिचकर, सुनिता नेर्लीकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, नायब तहसिलदार प्रकाश दगडे, नायब तहसिलदार अर्चना कुलकर्णी आदी उपस्थिती होते.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर