शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
3
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
4
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
5
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
6
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
7
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
8
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
9
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
11
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
12
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
13
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
14
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
15
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
16
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
17
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
18
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
19
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
20
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं

कोल्हापुरी चप्पलला चालना मिळणार

By admin | Updated: February 2, 2017 01:08 IST

अर्थसंकल्पात धोरण : हस्तकला व्यवसायामुळे गुंतवणुकीपेक्षा कर माफ करा : शेटे

कोल्हापूर : केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात स्वतंत्र लेदर व फुटवेअर धोरण करणार असल्याचे जाहीर केल्याने कोल्हापुरी चप्पल उद्योगास चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एक कोटी रुपये गुंतवणूक केल्यास त्यातून २५० ते ३०० लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. वस्त्रोद्योग धोरणातून हे अधोरेखित झाल्याने लेदर उद्योगाचेही स्वतंत्र धोरण करून त्यात गुंतवणूक झाल्यास ग्रामीण रोजगारच्या संधी प्राप्त होतील असे केंद्राला वाटते. त्याचे सूतोवाच या अर्थसंकल्पात केले आहे.याबाबत नगरसेवक व कोल्हापुरी चप्पलचे उत्पादक भूपाल शेटे म्हणाले, ‘हा हस्तकला उद्योग असून तो मजुरांवर आधारलेला आहे. त्यामुळे त्याची किंमत जास्त होत.े म्हणून सरकारने करांतून सूट द्यावी. कर्नाटकात चामडे सरकारकडून पुरविले जाते व अनुदानही दिले जाते. त्याचा विचार झाल्यास हा उद्योग नव्याने वाढू शकेल.कोल्हापूर चप्पल निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुभाष सातपुते म्हणाले, ‘केंद्र सरकारने हे धोरण निश्चित करताना नवीन गुंतवणुकीस प्राधान्य द्यावे. हा हस्तकला उद्योग घरगुती स्वरुपात केला जातो; परंतु करांमुळे तो परवडत नाही. म्हणून आम्हाला सर्व करांतून सवलत द्यावी. वीज नसलेली अजूनही १९ वाड्या-वस्त्याया अर्थसंकल्पात सन २०१८ पर्यंत देशातील सर्व गावे व वाड्या-वस्त्यांवर वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. कोल्हापूर जिल्ह्णांत सन २०११ च्या जनगणनेनुसार ३२ वाड्या वस्त्यांवर अजूनही वीजपुरवठा होत नाही असे स्पष्ट झाले होते. यापूर्वीच्या सरकारने त्यासाठी ‘राजीव गांधी ऊर्जा कार्यक्रम’ म्हणून घोषित केला होता. त्याच कार्यक्रमाचे भाजपच्या सरकारने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना’ असे नामकरण केले. जिल्ह्णांतील ३२ पैकी १३ गावांतील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता उर्वरित १९ गावांतील कामांच्या निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. ग्रामज्योती योजनेतून निधी मिळण्यास विलंब होत असल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. हा निधी ‘महावितरण’ला प्राप्त झाला असल्याने याच महिन्यापासून राहिलेल्या गावांतील विद्युतीकरणाची कामे सुरू होतील, अशी माहिती ‘महावितरण’च्या सूत्रांनी दिली.भवितव्य अंधकारमय कोल्हापूर जिल्ह्यांत सुभाषनगर परिसर, बाजारभोगाव, कळे, कांचनवाडी, लिंगनूर कापशी, मडिलगे आदी गावांत कोल्हापुरी चप्पल निर्मिती होते. साधारणत: वर्षाला सहा लाख चप्पलांची निर्मिती केली जाते. आठ हजारांवर लोक या उद्योगात आहेत. वर्षाची सरासरी उलाढाल दहा कोटींपर्यंत आहे. त्याचे आधुनिकीकरण न झाल्याने भवितव्य अंधकारमय बनले आहे.