शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूर :‘व्हीव्हीपॅट’द्वारे झाले १ लाख ६८ हजार अभिरूप मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:08 IST

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या चाचणीसाठी केर्ली येथील शासकीय गोदाम येथे अभिरूप मतदान ...

ठळक मुद्दे‘व्हीव्हीपॅट’द्वारे झाले १ लाख ६८ हजार अभिरूप मतदान२०० कर्मचाऱ्यांनी बजावला हक्क : केर्ली शासकीय गोदाम येथे प्रक्रिया

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या चाचणीसाठी केर्ली येथील शासकीय गोदाम येथे अभिरूप मतदान झाले. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत २०० कर्मचाऱ्यांनी हक्क बजावल्याने १ लाख ६८ हजार इतक्या मतदानाची नोंद झाली.जिल्ह्यातील १0 विधानसभा मतदारसंघांसाठी ईव्हीएमची ७३२१ बॅलेट्स व ४२५७ कंट्रोल युनिट्स व ४२५७ व्हीव्हीपॅट मशीन्स प्राप्त झाली आहेत. त्यांच्या प्राथमिक तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. प्रथमच ‘व्हीव्हीपॅट’ मशीन्सचा वापर निवडणुकीत होणार आहे; त्यामुळे या मशीनची चाचणी घेण्यासाठी अभिरूप मतदान घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होेते.त्यानुसार सकाळी ९ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी यांच्यासह कॉँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडी, हिंदु महासभा, आदी पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.गोदामात तीन ठिकाणी मांडण्यात आलेल्या टेबलवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे संच ठेवण्यात आले होते. करवीर, कागल येथील कर्मचाऱ्यांवर ८० मशीनची, गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा येथील कर्मचाऱ्यांवर ८० व पन्हाळा, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ येथील कर्मचाऱ्यांवर ४० मशीनची जबाबदारी होती.

ईव्हीएम मशीनवरील चिन्हापुढे बोट दाबल्यानंतर झालेल्या मतदानाप्रमाणे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये चिन्हांची चिठ्ठी येत होती व काही क्षणात ती बॉक्समध्ये पडत होती. इव्हीएमवर दाबलेल्या चिन्हाप्रमाणे व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठीत चिन्ह आहे का नाही? याची खातरजमा कर्मचाऱ्यांकडून केली जात होती.

पहिल्या ८० मशीनवर ८०००० मतदान झाले. या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्यांने १००० वेळा हक्क बजावला. दुसऱ्या ८० मशीनवर ४०००० मतदान होऊन येथे प्रत्येक कर्मचाऱ्याने ५०० वेळा, तर तिसऱ्या ४० मशीनवर ४८००० मतदान होऊन, प्रत्येक कर्मचाऱ्याने १२०० वेळा बटन दाबले.

‘बेल’ कंपनीच्या अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजून झालेल्या मतदानाची शहानिशा करण्यात आली. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली. मतदान झाल्यानंतर काही प्रतिनिधींनी आम्ही कोणाला मतदान केले आहे, हे कळण्यासाठी चिठ्ठी हवी असल्याचे सांगितले. यावर अधिकाऱ्यांनी तसे निर्देश नसल्याचे सांगितल्यावर. आमच्या सूचना आयोगाकडे कळवाव्यात, असे प्रतिनिधींनी सांगितले.

थर्मल पेपरची चिठ्ठी दहा वर्षे टिकणारव्हीव्हीपॅट मशीनमध्ये झालेल्या मतदानासाठी असणारी चिठ्ठी ही थर्मल पेपरची असून, त्यावरील शाई इतर चिठ्ठ्यांप्रमाणे उडू शकते, अशी शंका विचारल्यावर बेल कंपनीच्या अधिकाऱ्यानी किमान १0 वर्षे टिकेल, असा हा कागद व शाई असल्याचे सांगितले.

 

 

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीkolhapurकोल्हापूर