शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह, कर्करोग निदानासाठी विशेष शिबिरे, राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:28 PM

समीर देशपांडेकोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानां तर्गत सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ही योजना राबविली जात असून, आता उर्वरित १७ जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येणार आहे.याआधी प्राथमिक आरोग्य ...

ठळक मुद्दे राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत योजनाऔरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूरचा समावेशउर्वरित जिल्ह्यांत सुरू होणार योजना

समीर देशपांडे

कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ही योजना राबविली जात असून, आता उर्वरित १७ जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येणार आहे.याआधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर अशी शिबिरे घेण्यासाठी आर्थिक तरतुदीचा मुद्दा पुढे येत असे. मग जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून किंवा जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध झाल्यासच अशी शिबिरे घेता येत असत. मात्र, याला खूप मर्यादा पडत होत्या. मात्र, आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गतच या योजनेचा समावेश करण्यात आल्याने त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.या तीनही आजारांचे निदान करणारे तज्ज्ञ डॉक्टर यासाठी नियुक्त करण्यात येणार असून, त्यांच्याकडूनच या शिबिरांमध्ये तपासणी केली जाणार आहे. या शिबिरांमध्ये जर काही या आजारांची लक्षणे असलेले नागरिक आढळले, तर त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय असंसर्गीय रुग्ण कक्षाकडे पाठविण्यात येणार आहे. गरज पडल्यास पुढच्या उपचाराचीही सोय शासनामार्फत केली जाणार आहे. यासाठी आवश्यक ते डॉक्टर्स आणि अन्य मनुष्यबळ भरण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यासाठी १७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. १७ जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आता सुरू झाली असून मार्च २0१८ अखेर ही दोन शिबीरे घेण्यात येणार आहेत.

उर्वरित या जिल्ह्यांत सुरू होणार ही योजनारायगड, पालघर, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, बीड, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया

ही योजना कशासाठी?वयाच्या तिशीनंतर हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाची लक्षणे दिसत असल्याचे चित्र विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. बदललेली जीवनशैली, धूम्रपान, वाढत्या खतांचा वापर अशा अनेक कारणांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मात्र, ग्रामीण भागात आर्थिक कारणासह दुर्लक्षामुळे याबाबत लवकर निदान होत नाही व शेवटच्या टप्प्यात हे रोग झाल्याचे निष्पन्न होते. वेळीच निदान व्हावे आणि पुढे उपचार व्हावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यGovernmentसरकार