शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह, कर्करोग निदानासाठी विशेष शिबिरे, राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:31 IST

समीर देशपांडेकोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानां तर्गत सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ही योजना राबविली जात असून, आता उर्वरित १७ जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येणार आहे.याआधी प्राथमिक आरोग्य ...

ठळक मुद्दे राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत योजनाऔरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूरचा समावेशउर्वरित जिल्ह्यांत सुरू होणार योजना

समीर देशपांडे

कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ही योजना राबविली जात असून, आता उर्वरित १७ जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येणार आहे.याआधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर अशी शिबिरे घेण्यासाठी आर्थिक तरतुदीचा मुद्दा पुढे येत असे. मग जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून किंवा जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध झाल्यासच अशी शिबिरे घेता येत असत. मात्र, याला खूप मर्यादा पडत होत्या. मात्र, आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गतच या योजनेचा समावेश करण्यात आल्याने त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.या तीनही आजारांचे निदान करणारे तज्ज्ञ डॉक्टर यासाठी नियुक्त करण्यात येणार असून, त्यांच्याकडूनच या शिबिरांमध्ये तपासणी केली जाणार आहे. या शिबिरांमध्ये जर काही या आजारांची लक्षणे असलेले नागरिक आढळले, तर त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय असंसर्गीय रुग्ण कक्षाकडे पाठविण्यात येणार आहे. गरज पडल्यास पुढच्या उपचाराचीही सोय शासनामार्फत केली जाणार आहे. यासाठी आवश्यक ते डॉक्टर्स आणि अन्य मनुष्यबळ भरण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यासाठी १७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. १७ जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आता सुरू झाली असून मार्च २0१८ अखेर ही दोन शिबीरे घेण्यात येणार आहेत.

उर्वरित या जिल्ह्यांत सुरू होणार ही योजनारायगड, पालघर, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, बीड, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया

ही योजना कशासाठी?वयाच्या तिशीनंतर हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाची लक्षणे दिसत असल्याचे चित्र विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. बदललेली जीवनशैली, धूम्रपान, वाढत्या खतांचा वापर अशा अनेक कारणांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मात्र, ग्रामीण भागात आर्थिक कारणासह दुर्लक्षामुळे याबाबत लवकर निदान होत नाही व शेवटच्या टप्प्यात हे रोग झाल्याचे निष्पन्न होते. वेळीच निदान व्हावे आणि पुढे उपचार व्हावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यGovernmentसरकार