शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह, कर्करोग निदानासाठी विशेष शिबिरे, राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:31 IST

समीर देशपांडेकोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानां तर्गत सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ही योजना राबविली जात असून, आता उर्वरित १७ जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येणार आहे.याआधी प्राथमिक आरोग्य ...

ठळक मुद्दे राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत योजनाऔरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूरचा समावेशउर्वरित जिल्ह्यांत सुरू होणार योजना

समीर देशपांडे

कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ही योजना राबविली जात असून, आता उर्वरित १७ जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येणार आहे.याआधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर अशी शिबिरे घेण्यासाठी आर्थिक तरतुदीचा मुद्दा पुढे येत असे. मग जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून किंवा जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध झाल्यासच अशी शिबिरे घेता येत असत. मात्र, याला खूप मर्यादा पडत होत्या. मात्र, आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गतच या योजनेचा समावेश करण्यात आल्याने त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.या तीनही आजारांचे निदान करणारे तज्ज्ञ डॉक्टर यासाठी नियुक्त करण्यात येणार असून, त्यांच्याकडूनच या शिबिरांमध्ये तपासणी केली जाणार आहे. या शिबिरांमध्ये जर काही या आजारांची लक्षणे असलेले नागरिक आढळले, तर त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय असंसर्गीय रुग्ण कक्षाकडे पाठविण्यात येणार आहे. गरज पडल्यास पुढच्या उपचाराचीही सोय शासनामार्फत केली जाणार आहे. यासाठी आवश्यक ते डॉक्टर्स आणि अन्य मनुष्यबळ भरण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यासाठी १७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. १७ जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आता सुरू झाली असून मार्च २0१८ अखेर ही दोन शिबीरे घेण्यात येणार आहेत.

उर्वरित या जिल्ह्यांत सुरू होणार ही योजनारायगड, पालघर, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, बीड, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया

ही योजना कशासाठी?वयाच्या तिशीनंतर हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाची लक्षणे दिसत असल्याचे चित्र विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. बदललेली जीवनशैली, धूम्रपान, वाढत्या खतांचा वापर अशा अनेक कारणांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मात्र, ग्रामीण भागात आर्थिक कारणासह दुर्लक्षामुळे याबाबत लवकर निदान होत नाही व शेवटच्या टप्प्यात हे रोग झाल्याचे निष्पन्न होते. वेळीच निदान व्हावे आणि पुढे उपचार व्हावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यGovernmentसरकार