शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

Kolhapur: नरेंद्र मोदींकडून सामाजिक सदभाव उद्ध्वस्त, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

By समीर देशपांडे | Updated: May 26, 2023 19:01 IST

Kolhapur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्यांना आम्ही नऊ प्रश्न विचारत आहोत. हिंमत असेल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत

- समीर देशपांडेकोल्हापूर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्यांना आम्ही नऊ प्रश्न विचारत आहोत. हिंमत असेल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत. मोदी यांनी देशातील सामाजिक सदभाव उध्वस्त केला असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, या नऊ वर्षात अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. महागाई, बेरोजगारी वाढली. भरमसाठी कर आकारणी करूनही देशावरील कर्ज वाढतच निघाले आहे. हे देखील पैसे पुरेनात म्हणून सरकारी कंपन्याही विकायला काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही आणि आत्महत्याही थांबल्या नाहीत. अदानीसारख्या कंत्राटदारांना पाठबळ दिले गेले. चीनने आक्रमण केल्यानंतरही त्यांना क्लीनचीट दिली गेली. पंतप्रधान याबाबत काहीही बोलत नाहीत हे दुर्देवी आहे.

अल्पसंख्यांक, एस. टी. एन.टी.यांच्यावरील अत्याचार वाढले आहेत. जातनिहाय जनगणनेविषयी मोदी बोलत नाहीत. सर्व तपास यंत्रणा विरोधकांच्या मागे लावण्यात येत आहेत. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक कल्याणाच्या योजनांमध्ये कपात केली जात आहे. काेरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसानभरपाईही मिळालेली नाही.

शिंदे, फडणवीस सामना करू शकत नाहीतज्या पध्दतीने राज्यात सत्तांतर झाले ते लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे शिंदे फडणवीस हे महाविकास आघाडीशी सामना करू शकत नाहीत असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.  देवेंद्र फडणवीस कर्नाटकचे जे विश्लेषण करत आहेत तसे नाही. बेंगलोर विभाग वगळता अन्य कुठल्याही भागात भाजपला जादा मतदान झालेले नाही.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर