शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मध्यरात्री पावसाच्या सरी, देवगडात वीज वाहिन्या तुटल्या :आंबा बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 1:18 PM

कोल्हापूर शहर व परिसर तसेच साताऱ्या जिल्हायातील पाटण कपईड येथे सोमवारी  मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

ठळक मुद्देकाही ठिकाणी पाणी वाहिले. पण, पावसाचा फायदा होणार नाही. काही ठिकाणी तर उगवलेले पीक वाळून गेले आहे. या पावसाने पेरणीचे क्षेत्र वाढणार नाही.कोल्हापूर जिल्ह्याला ‘अवकाळी’चा फटका

कोल्हापूर/सातारा : कोल्हापूर शहर व परिसर तसेच साताऱ्या जिल्हायातील पाटण कपईड येथे सोमवारी  मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे रात्री अचानाक कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी सकल भागात पाणी साचल्याचे चित्र कोल्हापूरमध्ये दिसत होते. यामध्ये काही ठिकाणी शेतकºयांनी सुकत ठेवलेले पिकलेले पिक भिजल्याने नुकसान झाले. तर दिवाळीत काहींनी बाहेर लावलेले आकाशकंदील, रंगीबेरंगी विद्युत रोषणाईच्या माळा या देखिल भिजून गेल्या.

वीजेच्या कडकडाट्यासह पाऊस : गुºहाळे, वीट व्यवसायकांचे मोठे नुकसानकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाट्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने गुºहाळे, वीट व्यवसायकांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूर शहरातही सकाळी नऊच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आगामी दोन-तीन दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामाना खात्याने वर्तवला आहे.

सातारा : जिल्ह्यातील कºहाड, पाटणसह दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी पहाटेपासून अवकाळी पाऊस झाला. यामुळे कही खुशी कही गम असे चित्र असलेतरी दुष्काळी भागात पेरण्या अल्प प्रमाणात झाल्याने या पावसाचा फायदा होणार नाही. 

बंगालच्या उपसागरात गाजा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात चांगला पाऊस होत आहे. तर सातारा जिल्ह्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी पाऊस येईल अशी स्थिती होती. पण, रात्री उशिरापर्यंत पाऊस झाला नाही. मात्र, पहाटेच्या सुमारास माण तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने सुरूवात केली. अगदी सकाळपर्यंत पाऊस पडत होता. वरकुटे मलवडी, कुकुडवाड, धामणी, नरवणे, पळशी आदी गावांत कमी अधिक फरकाने पाऊस झाला. तसेच खटाव तालुक्यातील काही गावांत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पाणी वाहिले. पण, पावसाचा फायदा होणार नाही. 

दुष्काळी तालुक्यात रब्बी हंगामातील पेरण्या अल्प प्रमाणात झाल्या आहेत. काही ठिकाणी तर उगवलेले पीक वाळून गेले आहे. या पावसाने पेरणीचे क्षेत्र वाढणार नाही. फक्त पाऊस झाला असेच म्हणता येणार आहे. तसेच कºहाड आणि पाटण तालुक्यातही पाऊस झाला आहे.  

देवगडात अवकाळी पावसाची हजेरी -वीज वाहिन्या तुटल्या :आंबा बागायतदार चिंतेत

सिंधुदुर्ग :  देवगड तालुक्यात सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली यातच जामसंडे भटवाडी रोड येथे पहाटे ५ वा.सुमारास विद्युत वाहिनी तुटल्यामुळे देवगड जामसंडे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. वीज वितरणाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने सकाळी १० वा.सुमारास वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला.तसेच पावसाच्या अधून मधून हलक्या सरी पडत असल्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत पडला आहे.

रत्नागिरी -अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरी, लांजा, संगमेश्वरमध्ये पाऊस.

रत्नागिरी : अरबी समुद्र्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ऐन थंडीच्या मोसमात सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून पावसाने हजेरी लावल्याने आंबा व काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, राजापूर आदी भागात म्हणजे दक्षिण रत्नागिरीत हा पाऊस झाला.

रत्नागिरी परिसरात सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडाली. दिवसभर वातावरण ढगाळच होते. लांजा परिसरातही सकाळी १० वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली.

मागील एक, दोन दिवस झालेल्या उष्म्यावाढीनंतर सोमवारी राजापूर तालुक्यातही जोरदार पावसाने सर्वत्र ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. दिवसभर तो बरसतच होता. या पावसामुळे कुठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. संगमेश्वर तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एकच पळापळ झाली. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते.

 

 

 

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग