शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Kolhapur- महापूर निवारण आराखडा: कमानीचे पूल, उतरवतील महापुराची झूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 16:58 IST

रेडेडोह परिसरातील तुंबी : पन्हाळा मार्गावरील पाण्याला वाहते करण्याची गरज

समीर देशपांडे/राजेंद्र पाटीलकोल्हापूर : प्रचंड रहदारी असलेला कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद होण्याला केर्ली परिसरात रस्त्यावर येणारे पाणी कारणीभूत आहे. या ठिकाणी रेडेडोह परिसरात येणारे पाणी दोन-दोन आठवडे या ठिकाणची वाहतूक बंद करून टाकते. या तुंबलेल्या पाण्याचा फटका दहा गावांना बसतो; परंतु याचा शास्त्रीय अभ्यास करून नेमका पर्याय काढण्यासाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. या परिसरातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर या परिसरात कमानीचे पूल उभारले, तर एका बाजूला तुंबणारे पाणी निचरा होईल, असे सांगण्यात आले.

कोल्हापूर शहरातून रत्नागिरीकडे जाणाऱ्या याच महामार्गावरून किल्ले पन्हाळा आणि देव जोतिबाला रस्ता जातो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या पर्यटक आणि भाविकांची, रत्नागिरीलाही जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मालवाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. पावसाचे प्रमाण वाढले की, या रस्त्यावर पाणी येतेच हे प्रत्येक महापुराने सिद्ध केले आहे; परंतु याबाबत नेमका पर्याय काढण्यात एकीकडे अपयश आले असताना किंबहुना त्याबद्दल सर्वच पातळ्यांवर अनास्था असल्यामुळे गेली अनेक वर्षे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसत आहेत.हा मार्ग जरी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला असला तरी पावसाळ्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. नवा महामार्ग कोल्हापूरच्या बाहेरून जाणार असल्याने येथील पाण्याच्या निचऱ्याचा मुद्दा सध्या या विभागाच्या प्रस्तावात कुठेच नाही. म्हणूनच आता या परिसरातील महामार्गाचे काम सुरू होण्याआधी पिलरचे किंवा कमानीचे पूल उभारून रेडेडोहाचा तुंब घालण्यासाठीचे पर्याय अवलंबवावे लागणार आहेत.

दहा गावांना बसताेय फटकाचिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी खुर्द, निटवडे, शिंगणापूर, हणमंतवाडी, रजपूतवाडी, केर्ली, वडणगे या दहा गावांना या महापुराचा दरवर्षी मोठा फटका बसतो. जरी पन्हाळा रस्ता बंद झाला नाही तर चिखलीच्या बाजूला तुंबणारे पाणी अनेक दिवस शेतातच राहत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीला पारावार राहत नाही.

एसटीच्या १७० फेऱ्याकोल्हापूर-रत्नागरी-कोल्हापूर अशा या मार्गावरून रोज १७० फेऱ्या होतात. याशिवाय पर्यटक, भाविक आणि मोठ्या संख्येने नागरिक या मार्गावर प्रवास करत असतात. व्यावसायिक मालवाहतूकही या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर होते. ही सगळी वाहतूक पुराच्या काळात आठ दिवसांपासून बारा, तेरा दिवसांपर्यंत बंद असते. लांबच्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागतो.

रेडेडोहातील पाणी काढण्याची गरजपूर्वी कोल्हापूरचे नागरिक रेडे धुण्यासाठी चिखली, केर्ली परिसरातील डोहात यायचे. म्हणून या परिसराला रेडेडोह म्हटले जाते असे सांगण्यात येेते. कुंभी, भोगावती, तुळशी, कासारी या नद्यांतून वाहणारे पाणी चिखलीतील संगमावर एकत्र येते. तेथील अतिरिक्त पाणी रेडेडोहात येते. जुन्या काळात या ठिकाणी असणारा कच्चा भराव पाण्याच्या दाबाने फुटायचा आणि ‘रेडेडोह’ फुटला असे म्हटले जायचे. हा रेडेडोह फुटला की, पाणी कमी यायचे. त्यामुळेच यंदा अज्ञातांनी चर मारून पाणी घालवण्याचा प्रयत्न केला.

हे धोकादायक२०२१ राजाराम बंधारा ४३ फुटांवर असताना पन्हाळा रस्ता बंद२०२४ राजाराम बंधारा ४१ फुटांवर असताना पन्हाळा रस्ता बंद

महसूल खाते, ग्रामपंंचायती झोपल्याएकीकडे या ठिकाणी पाणी तुंबून वाताहत होत असताना महसूल खाते आणि ग्रामपंचायतींच्या परवानग्या घेत, न घेता याच परिसरात मोठ्या प्रमाणावर भर टाकून मंगल कार्यालये, पेट्राेलपंप, हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. जर हे भराव टाकण्याचे काम सुरूच राहिले तर कितीही पूल बांधले तरीही पाण्याचा निचरा होणार नाही, हे वास्तव आहे.

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर ३०/३२ वर्षांपूर्वी १० ते १५ फूट भर घालून रस्ता तयार करण्यात आला आणि पाणी अडायला सुरुवात झाली. परिणामी आमची गावंच्या गावं उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. शेतकऱ्यांना नुकसानीला पारावार राहिला नाही. तुम्ही कमानीचे पूल बांधा किंवा पिलरचे. आमच्या भागातलं पाणी तेवढं वाहतं करा. आता गावातील स्वच्छतेच्या कामातून रिकामे झाल्यानंतर याच मागणीसाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना भेटणार आहे. - रोहित पाटील, सरपंच, प्रयाग चिखली, ता. करवीर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर