शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

Kolhapur- महापूर निवारण आराखडा: कमानीचे पूल, उतरवतील महापुराची झूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 16:58 IST

रेडेडोह परिसरातील तुंबी : पन्हाळा मार्गावरील पाण्याला वाहते करण्याची गरज

समीर देशपांडे/राजेंद्र पाटीलकोल्हापूर : प्रचंड रहदारी असलेला कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद होण्याला केर्ली परिसरात रस्त्यावर येणारे पाणी कारणीभूत आहे. या ठिकाणी रेडेडोह परिसरात येणारे पाणी दोन-दोन आठवडे या ठिकाणची वाहतूक बंद करून टाकते. या तुंबलेल्या पाण्याचा फटका दहा गावांना बसतो; परंतु याचा शास्त्रीय अभ्यास करून नेमका पर्याय काढण्यासाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. या परिसरातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर या परिसरात कमानीचे पूल उभारले, तर एका बाजूला तुंबणारे पाणी निचरा होईल, असे सांगण्यात आले.

कोल्हापूर शहरातून रत्नागिरीकडे जाणाऱ्या याच महामार्गावरून किल्ले पन्हाळा आणि देव जोतिबाला रस्ता जातो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या पर्यटक आणि भाविकांची, रत्नागिरीलाही जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मालवाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. पावसाचे प्रमाण वाढले की, या रस्त्यावर पाणी येतेच हे प्रत्येक महापुराने सिद्ध केले आहे; परंतु याबाबत नेमका पर्याय काढण्यात एकीकडे अपयश आले असताना किंबहुना त्याबद्दल सर्वच पातळ्यांवर अनास्था असल्यामुळे गेली अनेक वर्षे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसत आहेत.हा मार्ग जरी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला असला तरी पावसाळ्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. नवा महामार्ग कोल्हापूरच्या बाहेरून जाणार असल्याने येथील पाण्याच्या निचऱ्याचा मुद्दा सध्या या विभागाच्या प्रस्तावात कुठेच नाही. म्हणूनच आता या परिसरातील महामार्गाचे काम सुरू होण्याआधी पिलरचे किंवा कमानीचे पूल उभारून रेडेडोहाचा तुंब घालण्यासाठीचे पर्याय अवलंबवावे लागणार आहेत.

दहा गावांना बसताेय फटकाचिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी खुर्द, निटवडे, शिंगणापूर, हणमंतवाडी, रजपूतवाडी, केर्ली, वडणगे या दहा गावांना या महापुराचा दरवर्षी मोठा फटका बसतो. जरी पन्हाळा रस्ता बंद झाला नाही तर चिखलीच्या बाजूला तुंबणारे पाणी अनेक दिवस शेतातच राहत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीला पारावार राहत नाही.

एसटीच्या १७० फेऱ्याकोल्हापूर-रत्नागरी-कोल्हापूर अशा या मार्गावरून रोज १७० फेऱ्या होतात. याशिवाय पर्यटक, भाविक आणि मोठ्या संख्येने नागरिक या मार्गावर प्रवास करत असतात. व्यावसायिक मालवाहतूकही या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर होते. ही सगळी वाहतूक पुराच्या काळात आठ दिवसांपासून बारा, तेरा दिवसांपर्यंत बंद असते. लांबच्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागतो.

रेडेडोहातील पाणी काढण्याची गरजपूर्वी कोल्हापूरचे नागरिक रेडे धुण्यासाठी चिखली, केर्ली परिसरातील डोहात यायचे. म्हणून या परिसराला रेडेडोह म्हटले जाते असे सांगण्यात येेते. कुंभी, भोगावती, तुळशी, कासारी या नद्यांतून वाहणारे पाणी चिखलीतील संगमावर एकत्र येते. तेथील अतिरिक्त पाणी रेडेडोहात येते. जुन्या काळात या ठिकाणी असणारा कच्चा भराव पाण्याच्या दाबाने फुटायचा आणि ‘रेडेडोह’ फुटला असे म्हटले जायचे. हा रेडेडोह फुटला की, पाणी कमी यायचे. त्यामुळेच यंदा अज्ञातांनी चर मारून पाणी घालवण्याचा प्रयत्न केला.

हे धोकादायक२०२१ राजाराम बंधारा ४३ फुटांवर असताना पन्हाळा रस्ता बंद२०२४ राजाराम बंधारा ४१ फुटांवर असताना पन्हाळा रस्ता बंद

महसूल खाते, ग्रामपंंचायती झोपल्याएकीकडे या ठिकाणी पाणी तुंबून वाताहत होत असताना महसूल खाते आणि ग्रामपंचायतींच्या परवानग्या घेत, न घेता याच परिसरात मोठ्या प्रमाणावर भर टाकून मंगल कार्यालये, पेट्राेलपंप, हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. जर हे भराव टाकण्याचे काम सुरूच राहिले तर कितीही पूल बांधले तरीही पाण्याचा निचरा होणार नाही, हे वास्तव आहे.

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर ३०/३२ वर्षांपूर्वी १० ते १५ फूट भर घालून रस्ता तयार करण्यात आला आणि पाणी अडायला सुरुवात झाली. परिणामी आमची गावंच्या गावं उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. शेतकऱ्यांना नुकसानीला पारावार राहिला नाही. तुम्ही कमानीचे पूल बांधा किंवा पिलरचे. आमच्या भागातलं पाणी तेवढं वाहतं करा. आता गावातील स्वच्छतेच्या कामातून रिकामे झाल्यानंतर याच मागणीसाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना भेटणार आहे. - रोहित पाटील, सरपंच, प्रयाग चिखली, ता. करवीर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर