शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कोल्हापूर : पंचगंगा काठच्या गावांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 4:26 PM

प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

ठळक मुद्दे पंचगंगा काठच्या गावांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडाखिद्रापूर येथे जलव्यवस्थापन बैठक, सांडपाण्याचे होणार व्यवस्थापन

कोल्हापूर : प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.सध्या जिल्ह्यामध्ये पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा तापला असून, याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार तातडीचा उपाय म्हणून सांडपाणी साठविण्यासाठी स्थिरीकरण तळे आणि बायोरेमिडिएशन पद्धतीद्वारे हे सांडपाणी नदीत जाण्यापासून थांबविण्यासाठी २२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. बायोरेमिडिएशन पद्धतीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे बॅक्टेरिया विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.शाळा, अंगणवाड्यांच्या स्वच्छतागृहांचेही सर्वेक्षण करण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या. यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, जलव्यवस्थापन समितीचे सदस्य बंडा माने, प्रा. शिवाजी मोरे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, राणी खमेलट्टी, तसेच राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्र. कार्यकारी अभियंता मनीष पवार, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ना. बा. भोई, शिरोळचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव उपस्थित होते.

जैनापूर येथे सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटनजैनापूर येथील सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी गावात निर्माण होणारे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या समोर साचून राहायचे, त्यामुळे गावात स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न उभे राहिले होते.या प्रकल्पांतर्गत तीन स्थिरीकरण तळी घेण्यात आली आहेत. या तळ्यांतून शुद्ध होणारे पाणी हे शेतीसाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम रु. १७.९१ लक्ष इतकी असून, या कामासाठी प्रत्यक्ष १०. ७० लक्ष इतका खर्च झालेला आहे.यावेळी राम शिंदे, सभापती अर्चना चौगले, उपसभापती संजय माने, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, राजगोंड पाटील यांच्यासह सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :riverनदीzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर