शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाढदिवसाचा केक तलवारीने कापला, राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षांविरोधात कोल्हापूर पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 14:40 IST

क्षीरसागर यांना अटक करण्याची केली मागणी

उद्धव गोडसेकोल्हापूर : वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्याबद्दल महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज, शनिवारी (दि. २६) तक्रार दिली असून, क्षीरसागर यांना अटक करण्याची मागणी केली आहे.राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. २४) जल्लोषात साजरा झाला. त्यावेळी शनिवार पेठेतील घराबाहेर क्षीरसागर यांनी तलवारीने केक कापला. यावर उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. क्षीरसागर यांनी सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्राने केक कापून दहशत माजवण्यासह गुन्हेगारीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप रविकिरण इंगवले यांनी केला आहे.क्षीरसागर यांच्या आक्षेपार्ह आणि बेकायेदशीर कृतीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. आर्म ॲक्टचे उल्लंघन करण्याबरोबरच क्षीरसागर यांनी शहरात विनापरवाना फलक आणि कमानी लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याचीही तक्रार इंगवले यांनी केली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल क्षीरसागर यांना अटक करावी, अशी मागणी इंगवले यांनी अर्जाद्वारे केली आहे. इंगवले यांच्या अर्जामुळे कोल्हापुरात शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस