शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कोल्हापूर :‘आंबा’ सामान्यांच्या आवाक्यात, ओली मिरची, कोंथिबीर दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:34 PM

कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील आंबा कोल्हापुरातील बाजारात दाखल झाल्याने, आंबा दर कमी झाल्याने परराज्यातील आंबा १०० ते १५० डझन झाल्याने सामान्याच्या आवाक्यात आंबा आल्याने आठवडी बाजारात ही आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, कोंथिंबिरीची पेंढी २५ ते ३० रुपये झाली आहे. दुसरीकडे कोबी, ओली भुईमूग शेंग, बीट यांची आवक मात्र वाढली आहे.

ठळक मुद्दे‘आंबा’ सामान्यांच्या आवाक्यात, ओली मिरची, कोंथिबीर दर वाढले कोबीची आवक वाढली

कोल्हापूर : कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील आंबा कोल्हापुरातील बाजारात दाखल झाल्याने, आंबा दर कमी झाल्याने परराज्यातील आंबा १०० ते १५० डझन झाल्याने सामान्याच्या आवाक्यात आंबा आल्याने आठवडी बाजारात ही आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, कोंथिंबिरीची पेंढी २५ ते ३० रुपये झाली आहे. दुसरीकडे कोबी, ओली भुईमूग शेंग, बीट यांची आवक मात्र वाढली आहे.

 कोल्हापुरात आंब्यांची आवक वाढल्याने आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.(छाया : दीपक जाधव)

गेल्या आठवड्यात वळवाचा पाऊस आला असला तरी भाजीपाल्यावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. काही प्रमाणात त्यांचे दर स्थिर होते. कोल्हापूरच्या बाजारपेठेत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांबाहेरून सर्व पालेभाज्या, फळभाज्यांची आवक नियमित सुरू असून त्यामध्ये ओली भुईमूग शेंग, रताळी, मुळा, बीट, तोंदली यांची आवक आठवडी बाजारात वाढली आहे. हिरव्या वाटाण्याची आवक मात्र पूर्णपणे बंद झाली. कोथींबिरीची पेंढी २० ते २५ रुपये झाली आहे.विशेष म्हणजे या आठवड्यात कोबीची आवक भरपूर आल्याने दहा रुपयांना एक गड्डा मिळत होता. फ्लॉवरही जवळपास तितक्याच किमतीला मिळत होता तर मेथीची पेंढी १५ रुपये स्थिर आहे. पालक, पोकळा व शेपू पेंढी १२ रुपयांपर्यंत होती. कारली, दोडका, भेंडी, गवार २५ रुपये होती. गेल्या आठवड्यापेक्षा मोसंबीचा दर कमी झाला. द्राक्षे, अननस व कलिंगडचा दर या आठवड्यात स्थिर होता. पावसाच्या वातावरणामुळे लिंबू दहा रुपयांना चार होते. आल्याची आवक कमी असल्यामुळे आले मात्र १०० रुपये किलोच आहे.

डाळींचे दर स्थिरअधिक महिना सुरू झाल्याने लग्नसराई संपल्याने डाळींची मागणी जरी कमी असली तरी गेल्या आठवड्याप्रमाणेच डाळींचे दर स्थिर असल्याचे व्यापारी दत्ता साळवी यांनी सांगितले. त्यामध्ये तूरडाळ ७० रु., मूगडाळ ७५, उडीदडाळ ६५, हरभरा डाळ ५४ रु., मसूर डाळ ६० रु, चवळी ८० ते १०० रु. आहे.

फळांची आवक कमी; दर वाढले...सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, अन्य फळांची आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे फळ विक्रेते संजय कोळी यांनी सांगितले. त्यामध्ये मद्रास, कर्नाटक आंब्याचा दर १०० ते १२५ रुपये डझनाचा दर आहे. रत्नागिरी हापूस आंबा २५० पुढे आहे. सफरचंदचा दर २१० रु. किलो आहे. चिक्कूचा दर ८० रु. १०० किलो दर आहे. मोसंबीचा दर १२० ते १३० आहे. पेरूचा दर ६० ते १०० रु. आहे. डाळिंबांचा दर १२० किलो आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMangoआंबाMarket Yardमार्केट यार्ड