शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

‘काळम्मावाडी, राधानगरी’ सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:50 AM

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने कोल्हापुरातील सर्वच धरणांचे आॅडिट करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास ...

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने कोल्हापुरातील सर्वच धरणांचे आॅडिट करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. यामध्ये ‘वारणा’, ‘दूधगंगा’ (काळम्मावाडी), ‘राधानगरी’ या प्रमुख धरणांसह सर्वच धरणे पूर्णपणे सुरक्षित आहेत. सहा तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असून, पडसाळी, केचरकरवाडी या तलावांची डागडुजी केली आहे.जिल्ह्यात ‘वारणा’, ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘तुळशी’ या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प ४०च्या पुढे आहेत. या धरणांची देखरेख ‘उत्तर’ व ‘दक्षिण’ विभागांमार्फत केली जाते. या धरणांचे आॅडिट विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांनी जागेवर जाऊन केले. यामध्ये ‘वारणा’, ’दूधगंगा’, ‘राधानगरी’ व ‘तुळशी’ या प्रमुख धरणांसह ‘कडवी’, ‘कासारी’ व ‘कुंभी’ या प्रकल्पांची तपासणी केली. हे प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित आहेत.कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी २९ प्रकल्पांना भेटी देऊन त्यांचे आॅडिट केले. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील पडसाळी, केचरकरवाडी यांच्या सांडव्यातून पाणी जात असल्याने संबधित ग्रामस्थांमध्ये भीती होती; पण पडसाळी तलावाच्या सांडव्याच्या गळतीचे काम पूर्ण झाले आहे. केचरवाडीच्या तलावाच्या इनटेकवेलचा प्रश्न २००९ पासून होता, त्याचीही दुरुस्ती करण्यात आली. त्याशिवाय सहा-सात तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.प्रत्येक तलावावरकर्मचाऱ्यांची नियुक्तीप्रमुख धरणांवर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आहेतच; पण लहान धरणे, तलावांच्या देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते. आता बहुतांशी धरणे व तलाव पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे दक्षता म्हणून तिथेही कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. काही ठिकाणी स्थानिकांना मानधनावर घेतले आहे.