शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात पदवी प्रवेशाचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: July 10, 2015 00:01 IST

जादा तुकडीची गरज : विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

जयसिंगपूर : पदवीच्या पहिल्या वर्षीच्या प्रवेशाचा प्रश्न जयसिंगपुरातही ऐरणीवर आला आहे. अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांच्या पहिल्या वर्षाचा प्रवेश प्रश्न गंभीर बनला असून, जयसिंगपूर महाविद्यालयाने बी.एस्सी.च्या जादा तुकडीबरोबरच बी.ए., बी.कॉम.साठी जादा जागांच्या मंजुरीचा प्रस्ताव विद्यापीठाला पाठविला आहे. बारावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जयसिंगपूर परिसरात एकमेव पदवीचे महाविद्यालय असून कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे अर्ज दाखल केल्यानंतर गुणवत्ता यादीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. मात्र, जागेपेक्षा मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. बी.एस्सी. भाग एकसाठी २४० जागा असून, जागांपेक्षा दुप्पट प्रवेश अर्ज दाखल झाल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी मोजकेच विषय असून, या परिसरातील विद्यार्थी दूरशिक्षण विभागाचा लाभ घेत आहेत. शेजारी असणाऱ्या सांगली व इचलकरंजी शहरांतील महाविद्यालयांतही हीच परिस्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ‘ना घरका, ना घाटका’ अशी अवस्था बनली आहे. कुरुंदवाड येथेही कला, वाणिज्य व विज्ञानच्या शाखा असून, गेल्या वर्षीपासून विज्ञानाची नव्याने शाखा सुरू झाली आहे. मात्र, तेथेही प्रवेशाचा प्रश्न गंभीर आहे. (प्रतिनिधी)प्रस्ताव विद्यापीठाकडे सध्या शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून, उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कलही वाढतो आहे. त्यामुळे नव्या महाविद्यालयांना किंवा तुकड्या वाढविण्यास बंदी घातली जाणार नाही, अशी माहिती उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी नुकतीच कोल्हापूर येथे दिली होती. त्यानुसार जयसिंगपूर महाविद्यालयानेही बी.एस्सी. भाग एकसाठी वाढीव एक जादा तुकडी आणि बी.ए., बी.कॉम. भाग एकसाठी वाढीव जागा मंजुरीसाठी प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविला आहे. येथे नियमानुसारच प्रवेश सुरू झाले आहेत, अशी माहिती जयसिंगपूर महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गांधी यांनी दिली.