शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे हिताचेच, पण संघटनांकडून मुद्दाम डोकी भडकवण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत, पण काही संघटनांकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना सरकारविरोधात भडकवले ...

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत, पण काही संघटनांकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना सरकारविरोधात भडकवले जात आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात केला. संघटनांनी हटवादी भूमिका सोडली तर केंद्र सरकार चर्चेला तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आरपीआय’च्या वतीने कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. देशातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन पुकारलेला भारत बंद पूर्णपणे फसला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुरुस्ती करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे; पण हे कायदे पूर्णपणे रद्द करा, ही त्यांची मागणी अवास्तव असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

कृषी कायद्याचे समर्थन करताना आठवले यांनी ज्यांचा विरोध आहे, त्यांनी संसदेच्या अधिवेशनात मुद्दे मांडावेत, शेतकरी संघटनांनी सरकारला बदल सुचवावेत असेही सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. काही त्रुटी दूर करण्यासही तयार आहे; पण शेतकऱ्यांनी आडमुठी भूमिका सोडून तडजोड करावी असेही आठवले यांनी सांगितले. संसदेत चर्चेवेळी त्रुटी दाखवून दिल्यास सरकार त्यांचा विचार करील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, रूपाली वायदंडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट ०१

जनगणना जातीनिहाय करा

देशात पुढील वर्षी होणारी जनगणना जातीनिहाय व्हावी, अशी मागणी करून या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. आर्थिक निकषाबरोबरच जातीवर आधारित आरक्षण पद्धत सुरू राहिलीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.