शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

सरकारचे साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 5:16 AM

देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे.

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर  - देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, हंगामातील पहिल्या चार महिन्यांत केवळ ११ लाख टन साखर निर्यातीच्या वाटेवर असून, यातील ६ लाख ६८ हजार टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेच्या दरांतील तफावतीमुळे निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.आतापर्यंत कारखान्यांनी सुमारे १५ लाख टनांपर्यंत निर्यातीचे करार केले आहेत. त्यातील ११ लाख ३ हजार ६३१ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे. यातील ६ लाख ६८ हजार ६८० टनच निर्यात झाली आहे. उर्वरित ४ लाख ३४ हजार ९५१ टन साखर निर्यातीच्या वाटेवर म्हणजेच जहाजात किंवा बंदरात आहे. यातील ४ लाख ६३ हजार टन साखर गेल्या महिन्यात निर्यात झाल्याचे आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने कळविले आहे.देशात सध्या २९२ लाख टन साखर उपलब्ध असून आणखी १२५ टन उत्पादन अपेक्षित आहे. देशाच्या गरजेपेक्षा सुमारे १४० टनांहून अधिक साठी असल्याने केंद्राने निर्यातीची सक्ती कारखान्यांना केली आहे. मात्र,देशांतर्गत दरापेक्षा २०० ते ३०० रुपये कमी मिळत असल्याने कारखाने निर्यातीला फारसे उत्सुक नाहीत.३ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसाशेतकऱ्यांच्या ऊस बिलापोटी देय एफआरपीची रक्कम थकविल्याप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ३ साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा पाठविल्या आहेत. त्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या राहुरी येथील तनपुरे व राहाता तालुक्यातील गणेश हे दोन सहकारी आणि जामखेड येथील जय श्रीराम शुगर अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो लि. या खासगी कारखान्याचा समावेश आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर