शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’च देणं ६ सप्टेंबरला ठरणार

By admin | Updated: August 17, 2015 00:47 IST

मुख्यमंत्र्यांना अहवाल : टोलप्रश्नी आज लवादासमोर होणार चर्चा

कोल्हापूर : टोलप्रश्नी आज, सोमवारी मुंबईत लवादासमोर ‘आयआरबी’, महापालिका आणि मूल्यांकन समितीचे प्रतिनिधी आपली बाजू लेखी स्वरूपात मांडणार आहेत. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘आयआरबी’चे देणं दि. ६ सप्टेंबरला निश्चित करणार आहेत. टोलप्रश्नी मागील मंगळवारी (दि. ११) झालेल्या बैठकीत ‘आयआरबी’चे प्रतिनिधी, महापालिका व कृती समिती यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोनसदस्यीय लवादासमोर मूल्यांकनाबाबत आपली बाजू मांडली. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे व अन्य उपस्थित होते.दोन्ही बाजूंनी जोरदार बाजू मांडल्याने कोणीही आपल्या मतांपासून दूर हटले नाही. त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लवादासमोर ‘आयआरबी’ व महापालिका यांना लेखी स्वरूपात नेमकं किती देणं आहे, याची विस्तृत माहिती सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार दोन्हींकडून बाजू मांडली जाईल. ‘आयआरबी’चे प्रतिनिधी, ‘महापालिकेतर्फे शहर अभियंता, तर मूल्यांकन समितीचे आर्किटेक्ट राजू सावंत, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके हे आपली बाजू लवादासमोर स्पष्ट करणार आहेत. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवाद आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री ‘आयआरबी’चं देणं किती हे ६ सप्टेंबरला निश्चित करण्याची शक्यता आहे. आयआरबी’चं देणं किती, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ६ सप्टेंबरला निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी देणं भागविताना ते संपूर्ण राज्य शासनाकरवी द्यावे. कोल्हापूर महापालिकेवर त्याचा बोजा टाकू नये. कारण महापालिकेची सद्य:स्थितीत आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे आमची कृती समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी ते देणं राज्य शासनाच्या गंगाजळीतून द्यावे. - निवासराव साळोखेटोलविरोधी कृती समिती, कोल्हापू