शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्याऐवजी ऊस रस्त्यावरच...

By admin | Updated: November 25, 2015 00:45 IST

शेतकऱ्यांना आर्थिक फटका : वाहनांमध्ये ऊस व्यवस्थित बांधला जात नसल्याचा परिणाम, अपघातालाही निमंत्रण

तानाजी घोरपडे --हुपरी -नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, ऊसतोड मजुरांकडून विविध मार्गांनी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट, कारखान्यांकडून मिळणाऱ्या रकमेचे त्रांगडे, आदी कारणांनी चिंताग्रस्त बनलेल्या शेतकऱ्यांचा ऊस वाहनांमध्ये व्यवस्थित बांधला जात नाही. त्यामुळे रस्त्यावर उसाच्या मोळ्या सांडत गेल्याने शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. तसेच अपघातास आपोआपच आमंत्रण मिळत आहे. शेतकऱ्यांना होणार आर्थिक तोटा व रस्त्यावरील अपघात थांबविण्यासाठी कारखाना प्रशासन, शेतकरी, ऊस वाहतूकदार व ऊसतोड मजुरांनी काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांबरोबरच कर्नाटक सीमाभागातील अनेक साखर कारखान्यांसाठी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात ओढवल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यामुळे ऊसतोड मिळविण्यासाठी सर्वच शेतकरी जिवाचा आटापिटा करीत आहेत. हातापाया पडून मिळविलेली ऊसतोड पार पाडण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्या व त्यांचे चोचली पुरवीपर्यंत शेतकऱ्यांची पळताभूई होत आहे. ऊसतोड झाल्यानंतर कारखान्याकडून मिळणाऱ्या एफ. आर. पी. चे त्रांगडे झाल्याने सर्वच शेतकरी हवालदील झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता वाहनातून ऊस रस्त्यावरती सांडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. परिणामी अपघातासही सामोरे जावे लागत आहे. ऊसतोड मजूर व वाहतूकदारांकडून वाहनांमध्ये उसाच्या मोळ्या व्यवस्थित रचल्या जात नाहीत. तसेच रोप लावून चांगले आवळले जात नाही. त्यामुळे वाहन काही अंतरावर गेल्यापासून कारखान्यापर्यंतच्या मार्गावर वाहनातून उसाच्या मोळ्याच मोळ्या रस्त्यावरती पडत जातात. अनेकवेळा एखादे वाहनच रस्त्याच्या वळणावर पलटी होऊन वाहनातील संपूर्ण ऊसच दिवस-दिवसभर उन्हामध्ये पडू राहण्याच्या घटनाही घडत असतात. अशा घटना कोणीही जाणिवपूर्वक करीत नाही. मात्र, ऊस वाहतुकीमध्ये बेफिकीरी केली जाते हे निश्चित आहे. निसर्गापासून, राज्यशासन, साखर कारखानदार, ऊसतोड मजुरांपर्यंतच्या अनेक अडचणींमध्ये संकटात व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे ऊस सांडणे या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखाना व्यवस्थापन, शेतकरी, ऊसतोड मजूर व वाहतूकदारांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.कर्णकर्कश गाणीट्रॅक्टर चालक कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपावरील गाणी वाजवत जातात. तसेच रात्रीच्यावेळी त्यास इंडिकेटर किंवा रेडियम नसल्याने वाहन थांबल्याचे इतर वाहनचालकांच्या लक्षातच येत नाही. त्यातून अपघात घडतात. तसेच, रस्त्याच्या मध्येच थांबलेल्या वाहनाच्या भोवती दगडं किंवा झाडाच्या फांद्या ठेवतात; पण वाहन दुरुस्त झाल्यानंतर ते दगड किंवा फांद्या काढून दूरवर न टाकता रस्त्यावर ठेवूनच निघून जातात. रात्रीच्या अंधारात मोटारसायकल चालक त्यास धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.गाड्यांच्या प्रखर प्रकाशामुळे अपघातऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टरच्या प्रखर दिव्यांवर काळी पट्टी नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनचालकांना त्याचा अंदाजच येत नाही. काही वाहने दोनऐवजी केवळ एकाच दिव्याच्या उजेडात जोरात वाहने चालवितात. त्यामुळे समोरून येणारे वाहन चारचाकी आहे की दुचाकी, हे जवळ येईपर्यंत त्याचा अंदाज येत नाही. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून ऊस रस्त्यावर पडतात. त्यावरून मोटारसायकलचे चाक घसरून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.छोटे-मोठे अपघातउसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागे लालदिवा, रेडियम नसल्याने मोटारसायकल चालकांना त्याचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात घडत आहेत. रस्ते महामार्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह साखर कारखान्यांनी त्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत.