शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मुंबई, पुण्यासह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मुंबई, पुण्यासह हजारोजण कोल्हापूर जिल्ह्यात येणार याची माहिती होती. सर्व रस्ते बंद करण्यात आले. येणाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. शहरातील महाविद्यालयांमध्ये आणि गावातील शाळांमध्ये आठवडाभर ठेवण्यात आले आणि मग घरी सोडण्यात आले. तरीही हजारो जणांना कोरोनाची लागण झाली. आता यातील काहीही सुरू नाही. सर्व काही बंद आहे. शासनाने नियम आणि अटी अशा केल्या आहेत की, त्यामुळे कोरोनाबाबत ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची अवस्था झाली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून टप्प्या-टप्प्याने सर्व शासकीय यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या. निधीच्या मर्यादा असतानाही निर्णय वेळेत घेतले गेले. सुरुवातीला मूलभूत सुविधा उपलब्ध करताना वेळ गेला. परंतु नंतर मात्र एकदा यंत्रणा उभारल्यानंतर त्याचा उपयोग सुरू झाला. संकटाची तीव्रता ओळखून स्वयंसेवी संस्थांनी धाव घेतली. कोविड केअर सेंटर्स उभारली. ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आणि सप्टेंबरच्या अखेरीपासून कोरोनाचा कहर कमी होऊ लागला.

आता पुन्हा जानेवारीनंतर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या टप्प्या-टप्प्याने वाढत आहे. १ एप्रिलपासून तर ती संख्या वेगाने वाढायला सुरुवात झाली. ३४ ही उच्चांकी मृत्युसंख्या सोमवारी नोंदविण्यात आली. रोज ५०० च्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत. एप्रिलअखेरपर्यंत ही संख्या वाढतच जाणार आहे. परंतु गेल्यावर्षी बाहेरून येणाऱ्यांवर जिल्ह्यात जी बंधने घातली आहेत, ती गळून पडल्याने धोका आणखी वाढला आहे.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंशत: अंमलबजावणी आवश्यक

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्यातील अंतर्गत प्रवासासाठी निगेटिव्ह अहवाल सक्तीचा केला होता. यावरून तक्रारी झाल्या आणि २४ तासात त्यांना तो आदेश मागे घ्यावा लागला. जिल्ह्यातच प्रवास करतानाची अट मागे घेतली असती, तर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही तरी बंधन आवश्यक होते. परंतु हा आदेशच मागे घ्यायला लावण्यात आल्याने आता सरसकट मुंबई, पुण्याहून आलेली मंडळी थेट घरातच वास्तव्यास जात आहेत. अजूनही या निर्णयाची अंशत अंमलबजावणी आवश्यक आहे.

चौकट

कितीजण जिल्ह्यात आले याचा पत्ताच नाही

जिल्ह्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर गेल्यावर्षी बंदोबस्त लावून त्या ठिकाणी येणाऱ्यांची तपासणी आणि नोंदणी होत होती. परंतु या वेळेला शहरांवरील भार कमी करण्यासाठी या सगळ्याला फाटा देण्यात आल्याने, आता बाहेरून किती मंडळी आली आणि ती कुठे गेली याची कोणतीही नोंद अजून तरी केली जात नाही.

चौकट

१९ दिवसात १४५ मृत्यू

गेल्या १९ दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात १४५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यातील २५ हून अधिक रुग्ण हे अन्य जिल्ह्यातील असले तरी, उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत. १ एप्रिलपासून १९ तारखेपर्यंत ५६९१ नवे रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होत असताना, ग्रामसमित्या आणि शहरांमधील प्रभाग समित्या अजूनही ताकदीने सक्रिय नसल्याचे जाणवते. तुलनेत कोल्हापूर शहरात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. परंतु रोजीरोटी थांबता कामा नये, या एकाच निकषामुुळे प्रशासनाच्या कडकपणालाही मर्यादा आल्या आहेत.