शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’चे देणे भागवायचे कसे?

By admin | Updated: November 7, 2014 00:47 IST

महापालिकेसमोर प्रश्नचिन्ह : अतिरिक्त कर, फेर सर्व्हेक्षण व न्यायालयात जाण्याचे पर्याय

संतोष पाटील- कोल्हापूर --न्यायालयाचा आदेश व राज्य शासनाचे टोलबाबतचे धोरण पाहता, ‘आयआरबी’च्या सर्व देण्यांची तरतूद महापालिकेलाच करावी लागण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेची परिस्थिती हलाखीची असताना नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकल्याशिवाय गत्यंतर नाही. रस्ते मूल्यांकन समितीच्या अहवालानुसार महापालिका ३२५ कोटी रुपयांचे देणे लागते. १७० कोटी पेक्षा कमी रकमेची कामे झाली असताना आता इतकी रक्कम द्यायची कशी? हा प्रश्न महापालिकेला सतावीत आहे.प्रकल्पाची मूळ किंमत २२० कोटी आहे. निगेटिव्ह ग्रॅँडचे २५ कोटी वजा करून १९५ कोटी राहतात. अद्याप किमान २५ कोटींची कामे बाकी असावीत, असा अंदाज आहे. म्हणजे प्रकल्पाची किंमत १७० कोटींवरच येते. कराराप्रमाणे किती कामे झाली? त्यांची किंमत काय? हे एकत्रित सर्व्हेनंतर स्पष्ट होणार असले, तरी असा सर्व्हे करण्याची मागणी करूनही रस्ते विकास महामंडळ किंवा राज्यशासन तयार झालेले नाही. रस्ते विकास प्रकल्पाचा करार हा महापालिका, आयआरबी व एमएसआरडीसी यांच्यातील त्रिस्तरीय करार आहे. यामुळे महापालिका कोणताही निर्णय एकट्याने घेऊ शकणार नाही. करारानुसार अद्याप ९५ टक्के काम पूर्ण झालेले नाही. तेवढे काम पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करता येत नाही. याबाबत महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. आता याच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयात जाण्याचा महापालिकेसमोर पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.सांगा, जगायचे कसे ? महापालिकेचा प्रश्नमहापालिकेचे अपेक्षित उत्पन्न २५० कोटींचे असले तरी सद्य:स्थितीत २०० कोटींचा टप्पा पार करणेही तिला मुश्कील आहे. यातच थेट पाईपलाईनसाठीचे कर्ज काढावे लागणार आहे. पंधरा वर्षांसाठी प्रतिवर्षी एक कोटी रुपयांना साडेनऊ कोटींप्रमाणे सहा कोटी ७० लाखांचा वर्षाला बोजा पडेल. आयआरबीचे देणे भागविण्यासाठी किमान १५० कोटींचा अतिरिक्त बोजा पडल्यास दरवर्षी १५ कोटी कर्जाचे हप्ते द्यावे लागतील. यापूर्वीच नगरोत्थानचे २६ कोटी, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा ३७ कोटी ५० लाख कर्जाचा बोजा असलेल्या पालिकेला नव्या कर्जाचा भार कसा पेलवणार ? टोलचे पैसे द्यावे लागल्यास ‘सांगा, जगायचे कसे?’ असे म्हणण्याची वेळ पालिका प्रशासनावर येणार असल्याचे प्राप्त परिस्थिती दर्शविते.भूखंडाचे काय ?महापालिकेचे तीन लाख चौरस फुटांचा मोठा भूखंड ‘आयआरबी’ला ९९ वर्षांसाठी दिला आहे. या भूखंडाची किंमत ‘डीएसआर’ प्रमाणे १०० कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे योग्य मूल्यांकन, आयआरबीने आतापर्यंत वसूल केलेली टोलची रक्कम व भूखंडाची किंमत वजा केल्यास मनपावर फारसा बोजा पडणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.संयुक्त पाहणीच नाहीरस्ते विकास प्रकल्पाच्या ९५ टक्के कामाच्या पूर्ततेबाबत भिन्नता आढळत असून, प्रकल्पाची जिल्हाधिकारी, आयुक्त व आयआरबीचे प्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करावी, अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी १ फेब्रुवारी २०१३ ला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. यावेळी आयआरबीचे अध्यक्ष वीरेंद्र म्हैसकर यांनी त्यास नकार दिला होता. मात्र, अद्याप अशी संयुक्त पाहणीच झाली नाही. संयुक्त पाहणी झाल्याखेरीज एकांगी दिलेल्या प्रकल्पाच्या किमतीचा अहवाल मान्य न करण्याची कृती समितीची भूमिका आहे.पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत एलबीटी-७७ मुद्रांक शुल्क-१३ पाणीपुरवठा-४० मिळकत कर-४२ इस्टेट -०८ नगररचना-२५ शासकीय अनुदान-३२ खर्चआस्थापना खर्च १५२ कोटीवीज व पाणी२५ कोटीविकासनिधी१५ कोटीप्राथमिक शिक्षण१८ कोटीघनकचरा व्यवस्थापन०५ कोटीकर्जाचा डोंगरथेट पाईपलाईन ४२ कोटीभूसंपादन १८ कोटीवाढीव खर्च ६५ कोटीएसटीपी कर्ज३७.५० कोटीनगरोत्थान योजना २६ कोटी