शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पद, प्रतिष्ठा आणि पैसा हेच हनिट्रॅपचे निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 15:32 IST

पदावर असलेली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्तीच हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे राज्यभरात घडलेल्या घटनांवरून पुढे आले आहे. अशा व्यक्तींना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे सोपे जाते, असाही त्यामागील होरा आहे.

ठळक मुद्देसगळा व्यवहार फेसबूकवर लैंगिक चॅटिंगमधून सावज जाळ्यात

कोल्हापूर : पदावर असलेली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्तीच हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे राज्यभरात घडलेल्या घटनांवरून पुढे आले आहे. अशा व्यक्तींना ब्लॅकमेल करून पैसे उकळणे सोपे जाते, असाही त्यामागील होरा आहे.

अशाप्रकारच्या फसवणुकीपासून सावधानतेने बचावलेल्या काहींनी यासंदर्भातील अनुभव शेअर केले व त्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. गेल्याच आठवड्यात साताऱ्यात एका प्रसिद्ध डॉक्टरला अशाच पद्धतीने जाळ्यात ओढून त्यांच्याकडे ६० लाखांची खंडणी मागण्याची घटना घडली आहे.या महिला आपले सावज मुख्यत: फेसबुकवर शोधत असतात. एखाद्या व्यक्तीने पोस्ट शेअर केली की त्यावर लगेच प्रतिसाद देऊन त्या माध्यमातून ओळख करून घेतली जाते. प्रत्यक्ष फोनवरून बोलणे किंवा भेटीच्या माध्यमातून या महिला कधीच समोर येत नाहीत. जे काही असेल ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संपर्क वाढविला जातो.

एकदा अंदाज आल्यानंतर मॅसेंजरवरून व्यक्तिगत चॅटिंग करत तुमची सगळी माहिती काढून घेतली जाते. हे चॅटिंगही अशा स्वरूपाचे असते की कोणतेही व्यक्ती त्याच्या मोहाला बळी पडते. सामान्यत: आपण पत्नी अथवा मैत्रिणीसोबतही ज्या प्रकारचे विषय कधीच फारसे बोलत नाही असे विषय बोलले जातात. व्यक्तीला या प्रकरणाच्या संभाषणाची भूक असते. असे काही दिवस झाल्यानंतर मग शेवटच्या टप्प्यात मला तुम्हाला पाहायची इच्छा आहे, असे सांगून कपडे उतरवण्यासाठी आग्रह धरला जातो.

व्हिडिओ कॉल करून तशा अवस्थेत मला तुम्हाला पाहायचे आहे, असे सांगितले जाते. एकदा असे केले की तुम्ही जाळ्यात अडकलाच म्हणून समजा. त्याच आधारे मग तुमच्याकडे पैशांची मागणी व ब्लॅकमेलिंग सुरू होते. संबंधित व्यक्ती वयाने जास्त असते. कोणत्या तरी संस्थेत पदावर काम करत असते. त्यामुळे अब्रूच्या भीतीने पैसे देऊन विषय मिटवून टाकण्याकडे कल असतो.

एकटी महिला अथवा पती-पत्नीकडून संगनमतानेही अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग केले जात आहे. कोल्हापुरातही काही दिवसांपूर्वी निगडी, पुणे परिसरातील महिलांकडून सतत फेसबुकवर वावर असणाऱ्या व्यक्तींना असे फोन आले आहेत. त्यांनी त्यातील धोका ओळखून वेळीच सावध झाल्यामुळे ते त्यांच्या ट्रॅपला बळी पडले नाहीत. सातारच्या घटनेनंतर त्यांना हे नेमके काय प्रकरण आहे याचा उलगडा आता झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर