शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:57 IST

बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्रीशहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला जागोजागी विक्रीचे स्टॉल

कोल्हापूर : बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे. त्यामुळे या काजूबियांविषयी जाणकारांकडून माहिती घेतल्यानंतर हा निकृष्ट दर्जाचा माल असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचा दर्जा तपासून घेणे गरजेचे आहे.

लॉकडाऊनच्या काळात कोणतीही वस्तू घरापर्यंत पोहोचवण्याचे काम विक्रेते चोख पार पाडू लागले आहेत. विक्री होणाऱ्या वस्तूंचा दर्जा कोठेही तपासला जात नाही. यातून अनेक वेळा खाद्यपदार्थांची होणारी विक्री आरोग्यास हानिकारक ठरू शकते. असाच प्रकार सध्या शहरातील अनेक ठिकाणी घडत आहे.

काही विक्रेते निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची विक्री कमी किमतीत करीत आहेत. सामान्य जनतेसाठी काजूचा वापर वाढत्या किमतीतून दुरापास्त झाला आहे. एक किंवा दोन काजूबिया खायला मिळणे म्हणजे भाग्याचे काम आहे.

सध्या बाजारात चांगल्या दर्जाच्या काजूबियांचा दर ७०० ते ८०० रुपये किलो असा आहे. याचाच परिणाम म्हणून अजाणतेपणाने नागरिक रस्त्याच्या कडेला टेम्पो अथवा स्टॉल लावून प्रतिकिलो ३५० ते ४०० रुपये किलो अशा दराने काजूबियांची विक्री करीत आहेत.

कमी किमतीत मिळते म्हटल्यानंतर अनेकजण त्याचा दर्जा न तपासताच ती वस्तू खरेदी करण्याकडे आकर्षित होतात. अशाच प्रकारे सध्या निकृष्ट दर्जाच्या काजूबिया विकल्या जात आहेत. काही प्रमाणात तुरट असणाऱ्या या काजूबियांमुळे घसा खवखवणे असे शरीरास अपाय होऊ शकतात.

विशेष म्हणजे हा काजू आजरा, चंदगड, तळकोकणातील काजू कारखान्यांतून खराब दर्जाचा म्हणून बाजूला ठेवलेला असतो. कमी किमतीत हा माल आणून काहीजण त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून अशा प्रकारे शहरासह ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत.

कोरोनामुळे आधीच सर्वांचा जीव मेटाकुटीला आला आहे. याचे गांभीर्य जाणून आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाने अशा निकृष्ट दर्जाच्या काजूबिया विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


चांगल्या काजूबियांचा भाव प्रतिकिलो ७००-८००, तर काजू पाकळीचा दर ६०० रुपये किलो व तुकडा काजूचा भाव ५५० रुपये प्रतिकिलो आहे. सध्या रस्त्याच्या कडेला पॅकिंग करून विकल्या जाणाऱ्या काजूबिया म्हणजे कारखान्यांतून नाकारलेला व आतून कीड लागलेला माल आहे. त्यामुळे हा माल तेलकट व खाल्ल्यानंतर घसा खवखवणे असे प्रकार होत आहेत.
- चिंतन शाह,
ड्रायफ्रुटस‌्चे घाऊक व्यापारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShoppingखरेदी