शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी; ‘पंचगंगे’ची पातळी ७ फुटांनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:28 IST

बारा बंधारे पाण्याखाली, ‘राधानगरी’चा विसर्ग कायम

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाने झोडपून काढले असून गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात सात फुटांनी वाढली असून, तब्बल १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, कागल, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.सोमवारी सकाळी आठ वाजता ‘पंचगंगे’ची पातळी १३ फुटांवर होती. सायंकाळी पाच वाजता २० फुटांवर पोहोचली. दरम्यान, आज मंगळवारीही कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

घटप्रभा धरण क्षेत्रात २२५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात सर्वच धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाला आहे. घटप्रभा धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल २२५ मिलिमीटर, तर कुंभी व पाटगावमध्ये २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ‘राधानगरी’ धरण क्षेत्रात १७२, कासारी परिसरात १४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील १९ सर्कलमध्ये ढगफुटीचंदगड, आजरा, कागल, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी व गगनबावडा तालुक्यातील १९ सर्कलमध्ये चोवीस तासांत ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये

  • हातकणंगले : ३०
  • शिरोळ - १९
  • पन्हाळा - ५४
  • शाहूवाडी - ५२
  • राधानगरी - ६५
  • गगनबावडा - १३५
  • करवीर - ४१
  • कागल - ६५
  • गडहिंग्लज - ४१
  • भुदरगड - ६५
  • आजरा - ६०
  • चंदगड- ७४