शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सातारचे जलयुक्त शिवार राजस्थानसाठी मार्गदर्शक

By admin | Updated: July 28, 2015 00:29 IST

प्रशासन लोकसहभाग आणि प्रसिद्धी माध्यमे यांची मोट बांधून सातारमध्ये जलक्रांती घडविण्याच्या दिशेने पावले उचलली़

महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या प्रभावी कामांची महती राजस्थानमध्ये पोहोचली आहे. राजस्थानमध्ये अशाच प्रकारे अभियान राबवून शाश्वत पाणीसाठा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांच्यासह सातारचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना खास सादरीकरणासाठी निमंत्रित केले होते. साताराचे जलयुक्त शिवार राजस्थानसाठी निश्चितपणे मार्गदर्शक आणि प्रेरणादायक ठरले आहे़ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी़ श्रीकांत, विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी आणि पत्रकार या टीमच्या माध्यमातून जिल्ह्याची भौगोलिक रचना, ऐतिहासिक पाणीपुरवठा योजना, जिल्ह्याची पाण्याची गरज, पीकपद्धती याबाबत अभ्यास, निरीक्षण करून सूक्ष्म नियोजन केले़. शाश्वत जलसाठे निर्माण करण्यासाठी तालुकानिहाय, डोंगर, विहिरी, जुने बंधारे आवश्यक असणारे माणसी पाणी, याबाबत बजेट तयार करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रशासन लोकसहभाग आणि प्रसिद्धी माध्यमे यांची मोट बांधून सातारमध्ये जलक्रांती घडविण्याच्या दिशेने पावले उचलली़माण, खटावसारख्या दुष्काळग्रस्त भागात माणगंगा नदीचे पुनर्जीवन हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला़ पाझर तलावांतील गाळ काढणे, लोकसहभाग वाढविणे, पाण्याविषयी जनजागृती, बंधाऱ्यांची निर्मिती, वृक्षारोपण अशी कामे मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली़ यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील किवळ ओढा-जोड प्रकल्प हा सर्वप्रथम यशस्वी ठरला़ वाई येथील गुळुंब, चांदक याही ओढा-जोड प्रकल्पाचे प्रात्यक्षिक यशस्वी ठरले आहे़राज्यपातळीवर तसेच पर्यायाने देश पातळीवर अभियानाला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी मुदगल यांनी ११ तालुक्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केले़ त्याला मोठा प्रतिसाद देत पत्रकारांनी तालुके दत्तक घेतले. तालुके दत्तक घेणारी ही योजना पत्रकारांच्या माध्यमातून केवळ सातारामध्ये घडली आहे़ राज्यपाल सी़ विद्यासागर राव आणि पंतप्रधानांचे सल्लागार एस़ रामादुराई यांनी विशेष दौऱ्याचे आयोजन करून वाई येथील ओढा जोड प्रकल्पास भेट दिली. या कामांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विशेष दौरा आयोजित करून साताऱ्यात झालेल्या कामांविषयी समाधान व्यक्त केले़ सातारा जिल्ह्यात झालेल्या कामाने प्रभावित होऊन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना जयपूर येथे झालेल्या कार्यशाळेत सादरीकरणासाठी निमंत्रित केले होते. या कार्यशाळेत सचिव देशमुख यांनी जलयुक्त शिवार अभियनाची माहिती दिली तर जिल्हधिकारी मुदगल यांनी तासाभराच्या संगणकीय सादरीकरणातून जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व, जिल्ह्याची गरज, केलेले सूक्ष्म नियोजन, अंमलबजवाणी, मिळालेले यश आणि प्रसिद्धी माध्यमांचा प्रत्यक्ष मोठा सहभाग याविषयी माहिती दिली़- प्रशांत सातपुते, माहिती अधिकारी