शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

‘पणन’ची शेतमाल तारण कर्ज योजना, शेतीमालाचे दर पडल्याने सरकारचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:48 PM

शेतमालाच्या काढणी हंगामात बाजारात भाव पडल्याने योग्य दर मिळत नाही; पण पैशांची गरज असल्याने माल घरातही ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना फुकापासरी दराने विक्री करावा लागतो. यासाठी सरकारने पणन मंडळाच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजार समिती, राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवणे बंधनकारक दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योजना बाजार समिती, कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

कोल्हापूर : शेतमालाच्या काढणी हंगामात बाजारात भाव पडल्याने योग्य दर मिळत नाही; पण पैशांची गरज असल्याने माल घरातही ठेवता येत नसल्याने शेतकऱ्यांना फुकापासरी दराने विक्री करावा लागतो. यासाठी सरकारने पणन मंडळाच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे.ज्या-त्या हंगामात शेतीमालाची आवक बाजारात वाढते, परिणामी दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. पैशांची गरज असल्याने शेतीमाल घरात ठेवणेही अवघड असते. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांना माल विकावा लागतो. यासाठी राज्य सरकारने शेतमाल तारण कर्ज योजना आणली आहे.

या योजनेत तूर, सोयाबीन, मूग, उडिद, चणा, भात, ज्वारी, बाजरी, मका, गहू, करडई, सूर्यफूल, हळद, बेदाणा व काजू बी या शेतीमालाचा समावेश आहे. तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत तारण कर्ज बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.

त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजार समिती किंवा राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवणे बंधनकारक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी बाजार समिती अथवा कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी केले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी