शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

गावरान आंबा होतोय ‘दुर्मीळ’

By admin | Updated: May 6, 2015 00:16 IST

शासनाने काही तरी उपाययोजना करण्याची गरज

कृष्णा सावंत- पेरणोली -आजरा व चंदगड तालुक्यांतील शेतकऱ्यांचा खजिना असलेल्या गावरान आंब्यावर सातत्याने दव्याचा परिणाम होत असल्याने या दोन्ही तालुक्यांतील चवीला मधुर असलेला गावरान आंबा संपुष्टात आला आहे.आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यांतील नैसर्गिक साधनसंपत्ती एकच आहे. तिन्ही तालुक्यांतील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण एकसारखे असल्याने आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. आजरा व चंदगडमधील गावरान आंबा हा चवीला मधुर असल्याने हा आंबा ग्रामीण भागात लोकप्रिय आहे.गत १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून या आंब्याच्या उत्पादनाचे प्रमाण कमी आले आहे. या आंब्याच्या विविध जातींमुळे प्रत्येक आंब्याच्या जातीला वेगळी चव आहे. मात्र, हा आंबा आता नाहीसा होऊ लागल्याने याची चवही नाहीसी झाली आहे. शेतातील प्रत्येक झाडाला शेकडो आंबे लागत असत. परंतु, आता सर्वच झाडे भकास झाली आहेत. दहा-पंधरा वर्षांपूर्वी शेतकरी झाडाखालील आंबे भरून आणण्यासाठी पोती घेऊन जात होता. आता मात्र आंब्याच्या झाडांकडेच बघण्याची वेळ आली आहे. कच्चे आंबे काढून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात अढी घातली जायची. ती अढीही आता नष्ट झाली आहे. या आंब्यामुळे शेतकऱ्याला व ग्रामीण भागातील नागरिकांना पौष्टिक मेवा मिळायचा, तो आता बंद झाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक हातभारही लागायचा, तोही बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी एका चांगल्या आंब्याच्या रानमेव्याला मुकला आहे.आम्हाला लहानपणी शेतातील भरपूर आंबे खायला मिळायचे. परंतु, दरवर्षी दव पडत असल्याने आंब्याचा मोहर गळू लागला आहे. त्यामुळे आंबा नष्ट झाला. यावर शासनाने काही तरी उपाययोजना करण्याची गरज आहे.- चंद्रकांत वंजारी, शेतकरी पेरणोली, ता. आजरा.