शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कचरा डेपो कोकणनगरमध्ये...

By admin | Updated: November 18, 2015 00:05 IST

रत्नागिरी नगरपरिषद : साळवी स्टॉप कचरामुक्त, आजपासून कार्यवाही

रत्नागिरी : शहराच्या प्रवेशद्वारावरील धुराचे साम्राज्य आणि जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील कचरा डेपो आता इतिहासजमा होणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात गेल्या वीस वर्षांपासून टाकला जाणारा संपूर्ण शहरातील कचरा उद्या (बुधवार) पासून शहरातील कोकणनगर येथील चिरेखाणींच्या मोकळ्या जागेत टाकला जाणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात शहरात दररोज जमा होणारा २२ ते २४ टन कचरा टाकला जात होता. दर महिन्याला याठिकाणी ६५० ते ७०० टन कचरा टाकला जात होता. गेल्या काही वर्षात याठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले. त्यामुळे जलशुध्दिकरण केंद्र कचऱ्यात हरवल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जेथे शहरवासीयांना पिण्यासाठी पुरवठा करावयाच्या पाण्याचे शुध्दिकरण केले जाते, त्याच आवारात कचऱ्याच्या ढिगांमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे मोकाट श्वान, मोकाट जनावरे, उंदीर व घुशी यांचे साम्राज्य या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात निर्माण झाले. पक्ष्यांमुळेही येथील दुर्गंधीयुुक्त कचरा इतस्तत: पसरत होता. कचऱ्याची भयावह स्थिती जलशुध्दिकरण प्रक्रियेबाबत संशय निर्माण करणारी होती. गेल्या वर्षभराच्या काळात सातत्याने याठिकाणी कचऱ्याचे ढीग पेटवून दिले जात होते. त्यामुळे संपूर्ण साळवी स्टॉप परिसराला धुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते.आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. कचरा पेटवल्यामुळे मुख्य रस्त्यावर धुराचे लोळ येत होते. त्यामुळे वाहने चालविणे धोकादायक बनले होते. या सर्व समस्यांबाबत स्थानिकांनी अखेर सेनेचे तालुकाप्रमुख व नगरसेवक बंड्या साळवी यांच्याकडे न्याय मागितला. त्यानुसार येत्या १५ दिवसात जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकणे बंद न केल्यास कचऱ्याच्या गाड्याच केंद्रात जाऊ देणार नाही, असा इशारा साळवी यांनी दिला होता.जिल्हाधिकाऱ्यांकडेही त्यांनी याबाबत गाऱ्हाणे मांडले होते. त्याची तातडीने दखल घेत आज नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी नगरसेवक प्रदीप साळवी यांच्या उपस्थितीत कोकणनगरमधील प्रदीप सावंत यांच्या जागेतील मोकळ्या चिरेखाणींची पाहणी करण्यात आली. त्यानंतर याठिकाणची जागा निश्चित करण्यात आली असून, उद्या बुधवारपासून कोकणनगरच्या या चिरेखाणींमध्ये रत्नागिरीचा कचरा टाकला जाणार आहे. कोकणनगरच्या या जागेत पूर्वी चिरेखाणी होत्या. प्रदीप सावंत यांचीच ही जागा असल्याने त्यांनी कचरा टाकण्यास मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)घनकचरा प्रकल्प : अथक प्रयत्न करूनही पदरी अपयश...रत्नागिरी नगरपरिषदेची कचरा समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी गेल्या काही काळात सातत्याने प्रयत्न केले. दांडेआडोम येथील जागेत घनकचरा प्रकल्पासाठी नगरपरिषदेच्या मालकीची जागा असून, रस्त्याचा प्रश्नही सुटला होता. मात्र, याठिकाणी प्रकल्प उभारण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच शहरापासून १२ किलोमीटर्सवर असलेल्या या ठिकाणी प्रकल्प खर्चिक ठरला असता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी घनकचरा प्रकल्प होण्यासाठी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. ‘लोकमत’चा पाठपुरावा‘लोकमत’ने वारंवार या कचऱ्याचा प्रश्न लावून धरला होता. या प्रश्नावर सडेतोड लिखाण केल्याने हा प्रश्न आता कायमचा निकाली निघणार आहे.