शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

कचरा डेपो कोकणनगरमध्ये...

By admin | Updated: November 18, 2015 00:05 IST

रत्नागिरी नगरपरिषद : साळवी स्टॉप कचरामुक्त, आजपासून कार्यवाही

रत्नागिरी : शहराच्या प्रवेशद्वारावरील धुराचे साम्राज्य आणि जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील कचरा डेपो आता इतिहासजमा होणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात गेल्या वीस वर्षांपासून टाकला जाणारा संपूर्ण शहरातील कचरा उद्या (बुधवार) पासून शहरातील कोकणनगर येथील चिरेखाणींच्या मोकळ्या जागेत टाकला जाणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात शहरात दररोज जमा होणारा २२ ते २४ टन कचरा टाकला जात होता. दर महिन्याला याठिकाणी ६५० ते ७०० टन कचरा टाकला जात होता. गेल्या काही वर्षात याठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले. त्यामुळे जलशुध्दिकरण केंद्र कचऱ्यात हरवल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जेथे शहरवासीयांना पिण्यासाठी पुरवठा करावयाच्या पाण्याचे शुध्दिकरण केले जाते, त्याच आवारात कचऱ्याच्या ढिगांमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे मोकाट श्वान, मोकाट जनावरे, उंदीर व घुशी यांचे साम्राज्य या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात निर्माण झाले. पक्ष्यांमुळेही येथील दुर्गंधीयुुक्त कचरा इतस्तत: पसरत होता. कचऱ्याची भयावह स्थिती जलशुध्दिकरण प्रक्रियेबाबत संशय निर्माण करणारी होती. गेल्या वर्षभराच्या काळात सातत्याने याठिकाणी कचऱ्याचे ढीग पेटवून दिले जात होते. त्यामुळे संपूर्ण साळवी स्टॉप परिसराला धुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते.आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. कचरा पेटवल्यामुळे मुख्य रस्त्यावर धुराचे लोळ येत होते. त्यामुळे वाहने चालविणे धोकादायक बनले होते. या सर्व समस्यांबाबत स्थानिकांनी अखेर सेनेचे तालुकाप्रमुख व नगरसेवक बंड्या साळवी यांच्याकडे न्याय मागितला. त्यानुसार येत्या १५ दिवसात जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकणे बंद न केल्यास कचऱ्याच्या गाड्याच केंद्रात जाऊ देणार नाही, असा इशारा साळवी यांनी दिला होता.जिल्हाधिकाऱ्यांकडेही त्यांनी याबाबत गाऱ्हाणे मांडले होते. त्याची तातडीने दखल घेत आज नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी नगरसेवक प्रदीप साळवी यांच्या उपस्थितीत कोकणनगरमधील प्रदीप सावंत यांच्या जागेतील मोकळ्या चिरेखाणींची पाहणी करण्यात आली. त्यानंतर याठिकाणची जागा निश्चित करण्यात आली असून, उद्या बुधवारपासून कोकणनगरच्या या चिरेखाणींमध्ये रत्नागिरीचा कचरा टाकला जाणार आहे. कोकणनगरच्या या जागेत पूर्वी चिरेखाणी होत्या. प्रदीप सावंत यांचीच ही जागा असल्याने त्यांनी कचरा टाकण्यास मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)घनकचरा प्रकल्प : अथक प्रयत्न करूनही पदरी अपयश...रत्नागिरी नगरपरिषदेची कचरा समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी गेल्या काही काळात सातत्याने प्रयत्न केले. दांडेआडोम येथील जागेत घनकचरा प्रकल्पासाठी नगरपरिषदेच्या मालकीची जागा असून, रस्त्याचा प्रश्नही सुटला होता. मात्र, याठिकाणी प्रकल्प उभारण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच शहरापासून १२ किलोमीटर्सवर असलेल्या या ठिकाणी प्रकल्प खर्चिक ठरला असता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी घनकचरा प्रकल्प होण्यासाठी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. ‘लोकमत’चा पाठपुरावा‘लोकमत’ने वारंवार या कचऱ्याचा प्रश्न लावून धरला होता. या प्रश्नावर सडेतोड लिखाण केल्याने हा प्रश्न आता कायमचा निकाली निघणार आहे.