शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीमुळेच खताच्या किमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रासायनिक खतांसाठी लागणारा फॉस्फरस, पोटॅशने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उसळी घेतली आहे. त्यातच इंधन ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : रासायनिक खतांसाठी लागणारा फॉस्फरस, पोटॅशने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उसळी घेतली आहे. त्यातच इंधन दरवाढीच्या भडक्यामुळेच रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ऐन खरिपात खताच्या पोत्यामागे ४० टक्के वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

केंद्र सरकारने खत कंपन्यांना दर ठरविण्याची मुभा दिल्याने खतांच्या दरात मोठी वाढ होत चालली आहे. सरकारचे नियंत्रण नसल्याने खत कंपन्या मनमानी दरवाढ करू लागल्याने शेती आतबट्ट्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वी खतांच्या दरात वाढ होत असली तरी पोत्यामागे ५० ते १०० रुपये व्हायची. यावेळेला मात्र पोत्यामागे ४० टक्के दरात वाढ झाली आहे. एकाच वेळी एवढ्या माेठ्या प्रमाणात वाढ होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे.

खतांच्या दरवाढीमागे इंधन दरवाढ व कच्चा मालाच्या दरात झालेली वाढ ही दोन कारणे आहेत. रासायनिक खतांसाठी ‘नायट्रोजन’, ‘फॉस्फरस’ व ‘पोटॅश’ची गरज असेत. यापैकी ‘नायट्रोजन’ वगळता फॉस्फरस व पोटॅश हे परदेशातून आयात करावा लागतो. प्रामुख्याने ‘जार्डन’, ‘चीन’ आदी देशातून कच्चा माल आणावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यात रुपयाच्या तुलनेत डॉलरचा दर वाढल्याचा परिणामही खत दरवाढीमागे आहे.

इंधन दरवाढीने तर कहर केला आहे. पेट्रोलने शंभरी पार केल्याने त्याचाही थेट परिणाम कच्चा माल व पक्का मालाच्या वाहतुकीवर झाला आहे. जहाजामधून कच्चा माल येत असतो. प्रदूषण कमी करण्यासाठी ‘ग्रीन फ्युएल’ वापरावे लागते. त्याच्या दरातही वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

कच्चा माल आयातीवर ‘कोरोना’चा अडसर

परदेशातून खत उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल आयात केला जातो; मात्र जगात काेरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे भारतात आहेत. त्यामुळे बाहेरील देशातील जहाजे येथे येण्यास फारशी उत्सुक नसल्याचा फटकाही बसला आहे.

तीन-चार महिन्यांत दर कमी

कच्चा मालाची वाहतूक सुरळीत झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर स्थिर झाले तर खतांच्या दरात घसरण होऊ शकते. ‘इफको’ने जुलै २०२० पासून १३६५ वरून ११७५ रुपयांपर्यंत दर खाली आणले होते.

न्युट्रिअंटसवर देते केंद्र सरकार अनुदान

केंद्र सरकार खतामधील न्युट्रिअंटसनुसार संबंधित कंपनीला अनुदान देते. नत्र, पालाश, झिंगचा वापर किती आहे, त्या प्रमाणावरच पैसे दिले जातात. ‘ १० : २६ : २६’ साठी सरकार ४१९ रुपये संबंधित कंपनीला अनुदानाच्या रूपाने देते.