शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात अन्न विषबाधेचे चार बळी; चिमगावात भाऊ-बहिण तर मांडरेतील दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:08 IST

मुरगूड : चिमगाव (ता. कागल) येथील श्रीयांश रणजित आंगज (वय ५), काव्या रणजित आंगज (८) या भावंडांचा विषबाधेने दुर्दैवी ...

मुरगूड : चिमगाव (ता. कागल) येथील श्रीयांश रणजित आंगज (वय ५), काव्या रणजित आंगज (८) या भावंडांचा विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. श्रीयांश याचा सकाळी, तर काव्या हिचा मंगळवारी संध्याकाळी मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला तरी काव्याचा व्हिसेरा राखून ठेवल्याने मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.अधिक माहिती अशी, चिमगाव येथील रणजित आंगज हे पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होते; पण काही वर्षांपूर्वी ते पत्नी व काव्या, श्रीयांश या दोन मुलांसह मूळ गाव चिमगाव येथे राहण्यास आले होते. रणजित मुरगूड येथील एका रुग्णालयात काम करत होते. रणजित यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार घरी कोणीतरी आलेल्या नातलगांनी आणलेल्या बेकरी उत्पादनांपैकी कप केक काव्या आणि श्रीयांश यांनी खाल्ले होते. त्यानंतर आम्हा तिघांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. सोमवारी रणजित यांच्या पत्नी यांनी स्वतःवर प्राथमिक उपचार करून घेतले होते.सोमवारी रात्री दोन्ही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी काव्या हिला दाखल करून श्रीयांश याची तब्येत चांगली असल्याने घरी सोडले. काव्यावर मात्र तातडीने उपचार सुरू केले. मंगळवारी पहाटे श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडली. त्याला तत्काळ मुरगूडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले; पण सकाळी आठच्या सुमारास श्रीयांशचा मृत्यू झाला.श्रीयांश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असतानाच काव्याची तब्येत बिघडल्याची माहिती नातेवाइकांना समजली. चिमुरड्या श्रीयांशवर अंत्यसंस्कार करून कुटुंबीय तत्काळ मुरगूडमध्ये उपचार सुरू असणाऱ्या काव्याला घेऊन कोल्हापूरला गेले. लहान मुलांच्या खासगी रुग्णालयात तिला दाखल केले. काव्याची प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळी सातच्या सुमारास काव्याचा मृत्यू झाला.सकाळी भावाचा, सायंकाळी बहिणीचा मृत्यूसोमवारी रात्री दोन्ही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी काव्या हिला दाखल करून श्रीयांश याची तब्येत चांगली असल्याने घरी सोडले. काव्यावर मात्र तातडीने उपचार सुरू केले. मंगळवारी पहाटे श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडली. सकाळी आठच्या सुमारास श्रीयांशचा मृत्यू झाला. श्रीयांश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असतानाच काव्याची तब्येत बिघडल्याची माहिती नातेवाइकांना समजली. चिमुरड्या श्रीयांशवर अंत्यसंस्कार करून कुटुंबीय तत्काळ मुरगूडमध्ये उपचार सुरू असणाऱ्या काव्याला घेऊन कोल्हापूरला गेले. काव्याची प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळी सातच्या सुमारास काव्याचा मृत्यू झाला.

विषबाधा नेमकी कशामुळे...

हसतखेळत असणारी दोन्ही मुले एका दिवसात डोळ्यांसमोर मृत्यूच्या खाईत गेल्याने आई-वडील आणि अन्य नातलगांनी काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला होता. पॅकबंद केक खाऊन विषबाधा झाली की अन्य कोणत्या गोष्टीने याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागल्याने काव्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. या दोन चिमुरड्या भाऊ बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती परिसरात समजल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. अधिक तपास मुरगूड आणि लक्ष्मीपुरी पोलिस करत आहेत.

आइस केकची चर्चा होती पण ..आइस केक खाल्ल्याची चर्चा सुरू आहे; पण तो साधा केक होता, अशी माहिती घटनास्थळी समजते. कोणत्या तरी नातलगाने तो केक घरी आणला, असे बोलले जात आहे. मुलांच्या आईने या संदर्भात कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. ती सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही, असे ग्रामस्थ सांगतात. पोलिस चौकशीमध्ये केक कोणी आणून दिला? तो नातलग कोण? तो कोणत्या ब्रँडचा होता? याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

मांडरे येथील आणखी दोघांचा मृत्यू, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्तम्हालसवडे : मांडरे (ता. करवीर) येथे पंधरा दिवसांपूर्वी पाटील कुटुंबातील चौघाजणांना अन्नातून विषबाधा झाली होती. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना यातील पांडुरंग विठ्ठल पाटील (वय ६५) यांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मंगळवारी (दि. ३) रोजी कृष्णात पांडुरंग पाटील (३५) व रोहित पांडुरंग पाटील (३०) या दोघांचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील प्रदीप पांडुरंग पाटील (२७) याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद पोलिसात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.पाटील कुटुंबातील चौघांना दि. १५ नाेव्हेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. सुरुवातीला त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सर्वांनाच खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान पांडुरंग पाटील यांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यातील कृष्णात व रोहित यांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.याच कुटुंबातील महिला गंगा कृष्णात पाटील (२५) व ओवी कृष्णात पाटील (३) यांना कोणतीही बाधा झाली नाही. ग्रामस्थांनी या कुटुंबातीलच महिलेवर पोलिसांसमोर घातपाताची शंका व्यक्त केली आहे.मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृत्यू पावलेल्या या दोन सख्ख्या भावांचे मृतदेह सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले होते. संशयित महिलेला ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ग्रामस्थांनी पोलिसांसमोर हट्ट धरला होता. रात्री उशिरा मृतदेहांवर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

विषबाधेतून मृत्यू पावलेल्या तिघांच्याही शवविच्छेदनातून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याचा अहवाल प्राप्त होताच विषाचा कोणता प्रकार आहे हे पाहून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या विषबाधेची चौकशी सुरू आहे. - किशोर शिंदे, पोलिस निरीक्षक, करवीर पाेलिस ठाणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfood poisoningअन्नातून विषबाधा