शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

कोल्हापूर जिल्ह्यात अन्न विषबाधेचे चार बळी; चिमगावात भाऊ-बहिण तर मांडरेतील दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:08 IST

मुरगूड : चिमगाव (ता. कागल) येथील श्रीयांश रणजित आंगज (वय ५), काव्या रणजित आंगज (८) या भावंडांचा विषबाधेने दुर्दैवी ...

मुरगूड : चिमगाव (ता. कागल) येथील श्रीयांश रणजित आंगज (वय ५), काव्या रणजित आंगज (८) या भावंडांचा विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. श्रीयांश याचा सकाळी, तर काव्या हिचा मंगळवारी संध्याकाळी मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला तरी काव्याचा व्हिसेरा राखून ठेवल्याने मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.अधिक माहिती अशी, चिमगाव येथील रणजित आंगज हे पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होते; पण काही वर्षांपूर्वी ते पत्नी व काव्या, श्रीयांश या दोन मुलांसह मूळ गाव चिमगाव येथे राहण्यास आले होते. रणजित मुरगूड येथील एका रुग्णालयात काम करत होते. रणजित यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार घरी कोणीतरी आलेल्या नातलगांनी आणलेल्या बेकरी उत्पादनांपैकी कप केक काव्या आणि श्रीयांश यांनी खाल्ले होते. त्यानंतर आम्हा तिघांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. सोमवारी रणजित यांच्या पत्नी यांनी स्वतःवर प्राथमिक उपचार करून घेतले होते.सोमवारी रात्री दोन्ही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी काव्या हिला दाखल करून श्रीयांश याची तब्येत चांगली असल्याने घरी सोडले. काव्यावर मात्र तातडीने उपचार सुरू केले. मंगळवारी पहाटे श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडली. त्याला तत्काळ मुरगूडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले; पण सकाळी आठच्या सुमारास श्रीयांशचा मृत्यू झाला.श्रीयांश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असतानाच काव्याची तब्येत बिघडल्याची माहिती नातेवाइकांना समजली. चिमुरड्या श्रीयांशवर अंत्यसंस्कार करून कुटुंबीय तत्काळ मुरगूडमध्ये उपचार सुरू असणाऱ्या काव्याला घेऊन कोल्हापूरला गेले. लहान मुलांच्या खासगी रुग्णालयात तिला दाखल केले. काव्याची प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळी सातच्या सुमारास काव्याचा मृत्यू झाला.सकाळी भावाचा, सायंकाळी बहिणीचा मृत्यूसोमवारी रात्री दोन्ही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी काव्या हिला दाखल करून श्रीयांश याची तब्येत चांगली असल्याने घरी सोडले. काव्यावर मात्र तातडीने उपचार सुरू केले. मंगळवारी पहाटे श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडली. सकाळी आठच्या सुमारास श्रीयांशचा मृत्यू झाला. श्रीयांश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असतानाच काव्याची तब्येत बिघडल्याची माहिती नातेवाइकांना समजली. चिमुरड्या श्रीयांशवर अंत्यसंस्कार करून कुटुंबीय तत्काळ मुरगूडमध्ये उपचार सुरू असणाऱ्या काव्याला घेऊन कोल्हापूरला गेले. काव्याची प्रकृती चिंताजनक होती. सायंकाळी सातच्या सुमारास काव्याचा मृत्यू झाला.

विषबाधा नेमकी कशामुळे...

हसतखेळत असणारी दोन्ही मुले एका दिवसात डोळ्यांसमोर मृत्यूच्या खाईत गेल्याने आई-वडील आणि अन्य नातलगांनी काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला होता. पॅकबंद केक खाऊन विषबाधा झाली की अन्य कोणत्या गोष्टीने याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागल्याने काव्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. या दोन चिमुरड्या भाऊ बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती परिसरात समजल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. अधिक तपास मुरगूड आणि लक्ष्मीपुरी पोलिस करत आहेत.

आइस केकची चर्चा होती पण ..आइस केक खाल्ल्याची चर्चा सुरू आहे; पण तो साधा केक होता, अशी माहिती घटनास्थळी समजते. कोणत्या तरी नातलगाने तो केक घरी आणला, असे बोलले जात आहे. मुलांच्या आईने या संदर्भात कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. ती सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही, असे ग्रामस्थ सांगतात. पोलिस चौकशीमध्ये केक कोणी आणून दिला? तो नातलग कोण? तो कोणत्या ब्रँडचा होता? याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

मांडरे येथील आणखी दोघांचा मृत्यू, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्तम्हालसवडे : मांडरे (ता. करवीर) येथे पंधरा दिवसांपूर्वी पाटील कुटुंबातील चौघाजणांना अन्नातून विषबाधा झाली होती. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना यातील पांडुरंग विठ्ठल पाटील (वय ६५) यांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मंगळवारी (दि. ३) रोजी कृष्णात पांडुरंग पाटील (३५) व रोहित पांडुरंग पाटील (३०) या दोघांचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील प्रदीप पांडुरंग पाटील (२७) याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद पोलिसात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.पाटील कुटुंबातील चौघांना दि. १५ नाेव्हेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. सुरुवातीला त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सर्वांनाच खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान पांडुरंग पाटील यांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यातील कृष्णात व रोहित यांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.याच कुटुंबातील महिला गंगा कृष्णात पाटील (२५) व ओवी कृष्णात पाटील (३) यांना कोणतीही बाधा झाली नाही. ग्रामस्थांनी या कुटुंबातीलच महिलेवर पोलिसांसमोर घातपाताची शंका व्यक्त केली आहे.मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृत्यू पावलेल्या या दोन सख्ख्या भावांचे मृतदेह सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले होते. संशयित महिलेला ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ग्रामस्थांनी पोलिसांसमोर हट्ट धरला होता. रात्री उशिरा मृतदेहांवर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

विषबाधेतून मृत्यू पावलेल्या तिघांच्याही शवविच्छेदनातून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याचा अहवाल प्राप्त होताच विषाचा कोणता प्रकार आहे हे पाहून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या विषबाधेची चौकशी सुरू आहे. - किशोर शिंदे, पोलिस निरीक्षक, करवीर पाेलिस ठाणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfood poisoningअन्नातून विषबाधा