शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पॉट बिलिंग’चा फज्जा

By admin | Updated: May 24, 2016 00:59 IST

राज्यातील पहिलीच योजना : नियोजनाअभावी गोंधळ

तानाजी पोवार --कोल्हापूर -पाणीपुरवठा विभागाचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ‘स्पॉट बिलिंग’च्या केलेल्या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. प्रत्यक्षात जागेवर जाऊन मीटरमधील रिडिंग पाहून तत्काळ जागीच बिल देण्याची ही योजना तशी चांगली असली, तरी त्याप्रमाणे पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे कनेक्शनधारकांच्या तक्रारी कमी होण्यापेक्षा त्या अधिकच प्रमाणात होऊ लागल्या आहेत. तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ग्राहकांना बिले मिळत आहेत. कोल्हापूर शहरात महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. यापूर्वी दर दोन महिन्यांनी ग्राहकांच्या हाती पाणी बिले पडत होती. या बिलात अनेक चुका असत. अनेकांना चक्रावून सोडणारी वाढीव रक्कमेची बिले हाती पडू लागल्याने नागरिकांतून तक्रारी वाढू लागल्या; पण त्यानंतर काही मीटर रिडर ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करून बिले कमी करून ती पुन्हा ग्राहकांच्या हाती देत असत. अनेकवेळा शहरातील इमारत बांधकामासाठी पाणी वापर हा व्यावसायिक असला, तरी मीटर रीडरच्या आशीर्वादाने घरगुती वापराची बिले हाती पडल्याची ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ केली जात होती. या अप्रत्यक्ष अपहाराला तसेच ग्राहकांकडून वाढणाऱ्या तक्रारींना फाटा देण्यासाठी महापालिकेच्यावतीने ‘स्पॉट बिलिंग’ची योजना कोल्हापूर शहरात ५ मार्चपासून सुरू केली. आॅनलाईनवरून ही बिले देण्याची योजना आहे; पण त्यासाठी तांत्रिक कर्मचारी वर्ग नसल्याचा अभाव येथे जाणवला. यासाठी महापालिकेच्यावतीने प्रत्येक कर्मचाऱ्यास एक चायना मेड मोबाईल, एक हँड प्रिंटर देण्यात आलेला आहे. यापैकी मोबाईलवर या पाणी बिलाबाबत सॉप्टवेअर व इंटरनेट लोड करून देण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षात मीटरचे रिडिंग घेऊन ते नोंद करून तिची प्रिंट देण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरत आहे. तसेच यासाठी कर्मचारी वर्गही अपुरा आहे. त्यामुळे ही पाण्याची बिले ग्राहकांच्या हाती दोन महिन्यांत पडण्याऐवजी ती चार ते पाच महिन्यांनी हाती पडू लागली आहेत. दरम्यान, ताराबाई पार्क परिसरातील मीटर रिडरच्या प्रिंटर यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे हा हँड प्रिंटर गेली महिनाभर बंद आहे. हा प्रिंटर दुरुस्तीसाठी दिल्यामुळे या मीटर रिडरने आता काही दिवसांपासून पूर्वीप्रमाणेच नोंदवहीत रिडिंग घेऊन त्याची बिले दिली जात आहेत. (क्रमश:)चार महिने उशिरा असा स्पॉट बिले तयार करताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईल रेंज, आदी अडथळ्यांची शर्यत पार करत एका कर्मचाऱ्यांकडून प्रतिदिनी ३० बिले तयार होतात. अशी ४५ कर्मचाऱ्यांमार्फत एका दिवशी सुमारे १३०० बिले परिपूर्ण होऊन ग्राहकांच्या हाती दिली जातात. अशी सुमारे १३०० बिले महिन्यातील २५ दिवस काम केल्यानंतर सुमारे ३३,५०० पर्यंत होतात. याशिवाय अशा पद्धतीने तीन महिने काम केल्यानंतर सुमारे एक लाख बिलांचा स्पॉट बिले परिपूर्ण होऊन ग्राहकांना मिळतात. याशिवाय बिलिंगच्या प्रिटिंग मशीन अडथळा, कर्मचाऱ्यांची रजा, सुटी याचा विचार करता एक बिल दिल्यानंतर पुन्हा ते पुढील बिल देण्याची प्रक्रिया येईपर्यंत सुमारे चार महिन्यांचा कालावधी उलटत आहे.