शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनींनाच दिला ‘संरक्षित क्षेत्रा’चा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:40 IST

अनंत जाधव लोकमत न्यूज नेटवर्क सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : आंबोली ते मांगेली (दोडामार्ग) हा भाग व्याघ्र कॉरिडोअर जाहीर करावा ...

अनंत जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : आंबोली ते मांगेली (दोडामार्ग) हा भाग व्याघ्र कॉरिडोअर जाहीर करावा म्हणून वनशक्तीची उच्च न्यायालयात याचिका असतानाच शासनाने मात्र आंबोली ते दोडामार्ग तालुक्यात येणाऱ्या वनविभागाच्या जमिनी पुरते संरक्षित क्षेत्र जाहीर करत स्वत: ची पाठ थोपटून घेतली आहे. तरी संंरक्षित क्षेत्राचा परिणाम कोणत्याही प्रदूषणकारी प्रकल्पाबाबत होताना दिसत नसून, शासनाची भूमिका संदिग्ध अशीच आहे. त्यातच शासनाने पूर्वी असलेल्याच वनविभागाच्या जमिनींना संरक्षित करून त्याचा दर्जा वाढविण्याचे काम केले आहे.

आंबोली ते मांगेली या क्षेत्रात व्याघ्र कॉरिडोअर व्हावा म्हणून वनशक्तीच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र याचिका अद्यापही न्यायालयाकडे प्रलंबित असून, यावर सध्या सुनावण्या सुरू आहेत. मात्र, उच्च न्यायालयाने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय दिला नाही.

चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सह्याद्रीच्या पट्ट्यातील सहा ठिकाणे संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून जाहीर केली, त्यात आंबोली ते दोडामार्ग असा ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्र हे संरक्षित करण्यात आले आहे. मात्र, ही सर्व जमीन यापूर्वीही संरक्षित होती. आता फक्त त्याचा दर्जा वाढविण्यात आला आहे. मात्र, क्षेत्र तेवढेच राहणार आहे.

नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होईल

सावंतवाडी ते दोडामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकल्प होऊ घातले आहेत. त्यात मायनिंग प्रकल्पाचाही समावेश आहे. मात्र, याला वन्यप्रेमींचा विरोध आहे. या क्षेत्रात अनेक वन्यप्रेमी तसेच वनषौधी असून असे प्रदूषणकारी प्रकल्प झाले तर ही नैसगिक साधनसंपत्ती नष्ट होईलच त्या शिवाय वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट होईल, अशी भीती पर्यावरणप्रेमींना वाटत आहे.