शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

कोल्हापूर शहरातील पाच रुग्णालये ‘हिटलिस्ट’वर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:34 IST

तपासणीसाठी अतिरिक्त पैसे घेणे, परवडणारे पॅकेज न करणे, रुग्णाला दोन-चार दिवस जादा अ‍ॅडमिट करून घेणे, अशा आॅनलाईन तक्रारी दाखल झाल्याने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेली कोल्हापूर शहरातील पाच रुग्णालये ‘हिटलिस्ट’वर आली आहेत. याची गंभीर दखल घेऊन जिल्हा समन्वयक यांनी याबाबतचा अहवाल

ठळक मुद्देअतिरिक्त पैसे घेतल्याच्या आॅनलाईन तक्रारी महात्मा फुले जनआरोग्य योजना

-गणेश शिंदे ।

कोल्हापूर : तपासणीसाठी अतिरिक्त पैसे घेणे, परवडणारे पॅकेज न करणे, रुग्णाला दोन-चार दिवस जादा अ‍ॅडमिट करून घेणे, अशा आॅनलाईन तक्रारी दाखल झाल्याने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेली कोल्हापूर शहरातील पाच रुग्णालये ‘हिटलिस्ट’वर आली आहेत. याची गंभीर दखल घेऊन जिल्हा समन्वयक यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविल्यामुळे या रुग्णालयांवर कारवाई अटळ असल्याचे मानले जाते. यापूर्वी या योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील दोन रुग्णालयांना त्यांच्या त्रुटींमुळे बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता.

गरिबांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांत, तर दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांत २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना सुरू झाली. सध्या ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ असे या योजनेचे नाव आहे. योजनेत जिल्ह्यातील ३२ रुग्णालयांचा समाविष्ट आहे. इचलकरंजी, गडहिंग्लज, नेसरी यांसह शहरातील रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये ९७१ आजारांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत २८ आॅनलाईन तक्रारी या योजनेचे जिल्हा समन्वयक यांच्याकडे दाखल झाल्या आहेत. एक्स-रे, सी.टी. स्कॅन, सोनोग्राफी, रक्ततपासणी, स्टेन्स बदलणे यांसह अतिरिक्त पैसे घेणे, परवडणारे पॅकेज न करणे (उदा. हृदयरोग, मूत्ररोग), रुग्णाला जादा दोन-चार दिवस दाखल करून घेणे असे तक्रारींचे स्वरूप आहे. त्याचबरोबर या रुग्णालयांवर कारवाई करा, अशीही मागणी लोकप्रतिनिधींकडे होत आहे.

राज्यात कोल्हापूर जिल्हा दुसºया क्रमांकावरकोल्हापूर जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ ते ३० सप्टेंबर २०१८ अखेर (चार वर्षे दहा महिने) या योजनेतील रुग्णालयांना ३०५ कोटी ९३ लाख ३० हजार १३९ रुपयांचा परतावा मिळाला आहे; तर एक लाख २१ हजार १०८ शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांपैकी गेल्या नऊ महिन्यांत ६५कोटी ८२ लाख ४८४ रुपयांचा परतावा मिळाला आहे; तर २७ हजार ४२६ शस्त्रक्रिया झाल्या. कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड (किडनी विकार) या आजारांच्या सर्र्वाधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या योजनेत राज्यामध्ये कोल्हापूरचा दुसरा क्रमांक लागतो.

आरोग्य शिबिरालाही हरताळया योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी महिन्याला दोन आरोग्य शिबिरे घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी रुग्णालयांना या शिबिरासाठी पाच-पाच हजार असे एकूण दहा हजार रुपये दिले जातात. या शिबिरांमधून योजनेचा जनजागृती करण्याचा शासनाचा उद्देश आहे; पण काही रुग्णालये आरोग्य शिबिरे घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई होणार आहे.

रुग्णालयाबाबत काही तक्रारी असल्यास रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा अथवा ‘सीपीआर’मधील योजनेच्या कार्यालयात भेटावे. त्यांच्या लेखी तक्रारीची दखल घेतली जाईल.

डॉ. सागर पाटील, जिल्हा समन्वयक,महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर