शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भयावह..! पंचगंगा बनली विषगंगा, प्रदुषणाच्या दाहकतेचे टोक; प्रशासनाने हात झटकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 11:52 IST

विकास करताना कोणतेही तारतम्य न बाळगल्याने एखाद्या नदीचे वाटोळे कसे लागू शकते, हे सध्याच्या पंचगंगा नदीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते.

कोल्हापूर : प्राचीन काळापासून आपल्याकडे नदी हे एक त्या त्या परिसराचे वैभव मानले गेले आहे. परंतु विकास करताना कोणतेही तारतम्य न बाळगल्याने एखाद्या नदीचे वाटोळे कसे लागू शकते, हे सध्याच्या पंचगंगा नदीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. गुरुवारी नदीकाठाने शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यापर्यंत गेल्यानंतर दुर्गंधी, काळे, पिवळे पाणी आणि काही ठिकाणी काठाला तरंगणारे मृत मासे असेच चित्र दिसून आले.

कोल्हापूर महापालिका, ३९ ग्रामपंचायती, इचलकरंजी नगरपालिका, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील अनेक औद्योगिक वसाहती, तेथील प्रक्रिया उद्योग यांच्या सांडपाण्यामुळे या नदीची अक्षरश: रसायनगंगा झाली आहे. याबद्दल गेली अनेक वर्षे आवाज उठवला जात असला, तरी सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे पंचगंगा गटारगंगाच बनत आहे.वळिवडे बंधाऱ्याजवळ हजारो मृत माशांचा खच पडल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर येथून पाणी खाली सोडण्यात आले. त्यामुळे मृत मासे खालीपर्यंत वाहत गेले. परिणामी रूकडी बंधाऱ्याच्या अलिकडे आणि पलिकडे तरंगणारे मासेच पाहायला मिळाले. या ठिकाणी धुणे धुणाऱ्या महिला नाकाला पदर बांधूनच धुणे धुवत होत्या. काठावर माशांचा एवढा खच होता की, पाय कुठे ठेवायचा, हेच कळत नव्हते. काठावरील चिखलात माशांचाही चिखल अशीच परिस्थिती होती. त्याच दुर्गंधीमध्ये पर्याय नसल्याने या महिला धुणे धुवत होत्या.

येथून पुढे रूई बंधाऱ्याजवळ गेल्यानंतर फारसे वेगळे चित्र नव्हते. रूकडी बंधाऱ्याकडून वाहत आलेले मृत मासे या बंधाऱ्याच्या अलिकडे नदीच्या दोन्ही कडेला तरंगत होते. त्याचा घाण वास परिसरात पसरला होता. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याच्या वर येऊन ऑक्सिजन घेण्यासाठी धडपडणारे मासे या ठिकाणी पाहावयास मिळत होते.

रुकडीपर्यंतच मृत मासेगांधीनगरच्या खालच्या बाजूस आणि रूकडी बंधाऱ्याच्या अलिकडच्या टप्प्यातच हे मासे मेले आहेत. गांधीनगरच्या वर आणि रूकडी बंधाऱ्याखाली मासे मेलेले नाहीत. त्यामुळे याच मधल्या भागातच हे मासे मेले आहेत.

गळती झाल्याची शक्यता

या परिसरातील एका रासायनिक कारखान्यातील गळती होऊन थेट रसायनच पंचगंगेमध्ये मिसळल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याआधी पाणी खराब झाल्याने केंदाळ दरवर्षीच वाढते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे पहिल्यांदाच मेल्याचे सांगण्यात आले.प्रशासनाने हात झटकलेपंचगंगा नदीतील मृत मासे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावण्यास भाग पाडण्यास जिल्हा प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही. त्यांनी हात झटकल्याने इतर कोणताही विभाग याकडे गांभिर्यांने पाहत नसल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

सात, आठ दिवस झाले पाण्याला घाण वास येतच होता. आता मेलेल्या माशांच्या वासाने डोकं दुखायला लागले आहे. गावात जर जादा पाणी सोडले असते, तर आम्ही धुण्याला नदीला कशाला आलो असतो. पण गरिबाचं ऐकणार कोण. गावातसुध्दा दोन रुपये लिटर पाणी विकत घ्यायची वेळ आली आहे. पाणी शुध्द करत्यात; पण हे पाणी शुध्द केलं तरी प्यायजोगं आहे काय, तुम्ही सांगा. -हजरतबी दरवेशी, रहिवासी, रूकडी

मी गेल्या दहा दिवसांपासून रूकडी बंधाऱ्याजवळ सरबत आणि ताक विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु या ठिकाणी सरबत घेण्यासाठी थांबणारा प्रत्येकजण पाणी कुठलं वापरताय, असे विचारतो. त्यामुळे मी गावातूनच विकत पाणी आणतो. - राजुद्दीन मुजावर चिंचवाड

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणWaterपाणी