शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

कर्जमुक्तीचा पहिल्या टप्प्यातील आकडा सोमवारी होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 4:50 PM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार हा आकडा सोमवारी स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर सोमवार (दि.२३) ते बुधवार (२५)पर्यंत उर्वरित ६५० गावांत चावडी वाचनाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत २,७०,५९० अर्ज प्राप्त कर्जमाफीची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू बुधवारपर्यंत उर्वरित ६५० गावांत चावडी वाचनाचे काम पूर्ण करण्यात येणार

कोल्हापूर , दि. १९ :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्यात किती शेतकऱ्याना त्याचा लाभ मिळणार हा आकडा सोमवारी स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर सोमवार (दि.२३) ते बुधवार (२५)पर्यंत उर्वरित ६५० गावांत चावडी वाचनाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

बुधवारी दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफी झालेल्या काही शेतकऱ्याना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देऊन कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. कोल्हापुरातही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते निवडक शेतकऱ्याना ही प्रमाणपत्रे देण्यात आली.

या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ८ लाख ४० हजार शेतकºयांना चार हजार कोटी रुपयांची कर्जमाफीसाठी तरतूद करून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली.

कोल्हापूर जिल्ह्यात किती लोकांना पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीचा लाभ होणार हे सोमवारी (दि. २३) स्पष्ट होणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना अद्याप शासनाकडून आलेल्या नाहीत. त्या सोमवारपर्यंत येणार असून त्यानंतरच जिल्ह्यातील आकडा कळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २,७०,५९० अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा मध्यवर्र्ती बँकांमधील ५३,२६२ थकबाकीदार असून २२३ कोटी १७ लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे तर राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बँकांमधील ५४,७२९ थकबाकीदार असून थकबाकीची रक्कम ६५ कोटी १३ लाख आहे.

जिल्ह्यातील एकूण पात्र १८४८ सेवा संस्थांमधील २,५२,९७० सभासदांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. शासननिर्णयानुसार २००९ पूर्वीचे व ३१ मार्च २०१६ नंतरचे थकबाकीदार या कर्जमाफीत येणार नाहीत. यामध्ये २०१५-१६ व २०१६-१७ मधील नियमित परतफेड करणाऱ्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ३९१ ग्रामपंचायतींचे चावडी वाचन पूर्ण झाले असून उर्वरीत ६५० ग्रामपंचायतींचे चावडी वाचन सोमवार (दि.२३) ते बुधवार (दि.२५)पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर