शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

इचलकरंजीच्या वारणा योजनेला अंतिम मान्यता

By admin | Updated: June 24, 2016 00:47 IST

दोन महिन्यांत काम सुरू : ७१ कोटींच्या योजनेचा ‘अमृत’मध्ये समावेश; सुरेश हाळवणकर यांची माहिती

इचलकरंजी : दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणाऱ्या ७१ कोटी रुपये खर्चाच्या नळ पाणी योजनेला शासनाच्या उच्चस्तरीय समितीने गुरुवारी अंतिम मान्यता दिली. या योजनेला प्रत्यक्षात येत्या दोन महिन्यांमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.सद्य:स्थितीस शहरास पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून पिण्याच्या पाण्यासाठी उपसा केला जातो. पंचगंगा नदीतील प्रदूषण आणि उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शहरास पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम म्हणून पाच दिवसांतून एक वेळ पाण्याचा पुरवठा होतो. अशा पार्श्वभूमीवर वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना राबविण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनास दिला. वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना १९.५ किलोमीटर लांबीची असून, नदीमध्ये कायमस्वरूपी पाण्याचा साठा राहावा, यासाठी नदीपात्रात दोन कोटी रुपये खर्चून बंधारा बांधण्यात येणार आहे. नव्या वारणा योजनेसाठी सन २०४९ मध्ये असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून दररोज ८९ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्याची क्षमता या प्रकल्पात ठेवण्यात आली आहे.वारणा नळ योजनेबाबत सांगताना आमदार हाळवणकर म्हणाले, या योजनेचा अमृत सिटी आराखड्यामध्ये मागील वर्षी समावेश करण्यात आला. तसेच अमृत योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याकरिता कमी कालावधी शिल्लक असतानासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. त्यासाठी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर व मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद म्हैसकर यांचे सहकार्य लाभले. इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेबाबत दानोळी परिसरामध्ये गैरसमज पसरविण्यात आला आहे. इचलकरंजीला लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण चांदोली धरणात करण्यात आले असून, ते पाणी वारणा नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे दानोळी गावातील शेतकऱ्यांना कोणतीही पाणीटंचाई भासणार नाही. तसेच सध्या कृष्णा नदीमध्ये जाणारे पाणीसुद्धा चांदोली धरणामध्ये सोडले जाते. त्यामुळे इचलकरंजीसाठी असलेली नळ योजना दानोळी गावासाठी विकासाची ठरणार आहे. म्हणून या योजनेला विरोध करण्याची भूमिका ग्रामस्थांनी सोडून द्यावी, असेही आवाहन आमदार हाळवणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)आमदारांच्या विरोधामुळे जादा भुर्दंड : बावचकरवारणा नदीतून पाणी आणणारी मूळ योजना दहा वर्षांपूर्वी नगरपालिकेतील कॉँग्रेसनेच तयार केली होती. त्यावेळी आमदार हाळवणकर यांनी केलेला विरोध आणि आता अमृत सिटी योजनेमध्ये या योजनेचा झालेला समावेश यामुळे नगरपालिकेला ही योजना महाग ठरत आहे, असा आरोप कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर, गटनेते बाळासाहेब कलागते व उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी पत्रकार बैठकीत केला. ते म्हणाले, त्यावेळी वारणा योजना ५४ कोटींची होती. युआयडीएसएसएमटी या योजनेच्या पॅटर्नमधून या योजनेला पाच कोटी रुपये नगरपालिकेचा हिस्सा होता. आता मात्र ७२ कोटी रुपयांची ही योजना झाली असून, अमृत सिटीच्या पॅटर्नप्रमाणे नगरपालिकेचा हिस्सा १८ कोटींचा झाला आहे, तर जीवन प्राधिकरणाला त्याचे शुल्क पावणे दोन कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. परिणामी पंधरा कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड नगरपालिकेवर बसला आहे.