शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

इचलकरंजीच्या वारणा योजनेला अंतिम मान्यता

By admin | Updated: June 24, 2016 00:47 IST

दोन महिन्यांत काम सुरू : ७१ कोटींच्या योजनेचा ‘अमृत’मध्ये समावेश; सुरेश हाळवणकर यांची माहिती

इचलकरंजी : दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणाऱ्या ७१ कोटी रुपये खर्चाच्या नळ पाणी योजनेला शासनाच्या उच्चस्तरीय समितीने गुरुवारी अंतिम मान्यता दिली. या योजनेला प्रत्यक्षात येत्या दोन महिन्यांमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.सद्य:स्थितीस शहरास पंचगंगा व कृष्णा या दोन नद्यांतून पिण्याच्या पाण्यासाठी उपसा केला जातो. पंचगंगा नदीतील प्रदूषण आणि उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शहरास पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम म्हणून पाच दिवसांतून एक वेळ पाण्याचा पुरवठा होतो. अशा पार्श्वभूमीवर वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना राबविण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनास दिला. वारणा नदीतून पाण्याचा उपसा करणारी नळ योजना १९.५ किलोमीटर लांबीची असून, नदीमध्ये कायमस्वरूपी पाण्याचा साठा राहावा, यासाठी नदीपात्रात दोन कोटी रुपये खर्चून बंधारा बांधण्यात येणार आहे. नव्या वारणा योजनेसाठी सन २०४९ मध्ये असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून दररोज ८९ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्याची क्षमता या प्रकल्पात ठेवण्यात आली आहे.वारणा नळ योजनेबाबत सांगताना आमदार हाळवणकर म्हणाले, या योजनेचा अमृत सिटी आराखड्यामध्ये मागील वर्षी समावेश करण्यात आला. तसेच अमृत योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याकरिता कमी कालावधी शिल्लक असतानासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. त्यासाठी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर व मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद म्हैसकर यांचे सहकार्य लाभले. इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेबाबत दानोळी परिसरामध्ये गैरसमज पसरविण्यात आला आहे. इचलकरंजीला लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण चांदोली धरणात करण्यात आले असून, ते पाणी वारणा नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे दानोळी गावातील शेतकऱ्यांना कोणतीही पाणीटंचाई भासणार नाही. तसेच सध्या कृष्णा नदीमध्ये जाणारे पाणीसुद्धा चांदोली धरणामध्ये सोडले जाते. त्यामुळे इचलकरंजीसाठी असलेली नळ योजना दानोळी गावासाठी विकासाची ठरणार आहे. म्हणून या योजनेला विरोध करण्याची भूमिका ग्रामस्थांनी सोडून द्यावी, असेही आवाहन आमदार हाळवणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)आमदारांच्या विरोधामुळे जादा भुर्दंड : बावचकरवारणा नदीतून पाणी आणणारी मूळ योजना दहा वर्षांपूर्वी नगरपालिकेतील कॉँग्रेसनेच तयार केली होती. त्यावेळी आमदार हाळवणकर यांनी केलेला विरोध आणि आता अमृत सिटी योजनेमध्ये या योजनेचा झालेला समावेश यामुळे नगरपालिकेला ही योजना महाग ठरत आहे, असा आरोप कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर, गटनेते बाळासाहेब कलागते व उपनगराध्यक्ष महावीर जैन यांनी पत्रकार बैठकीत केला. ते म्हणाले, त्यावेळी वारणा योजना ५४ कोटींची होती. युआयडीएसएसएमटी या योजनेच्या पॅटर्नमधून या योजनेला पाच कोटी रुपये नगरपालिकेचा हिस्सा होता. आता मात्र ७२ कोटी रुपयांची ही योजना झाली असून, अमृत सिटीच्या पॅटर्नप्रमाणे नगरपालिकेचा हिस्सा १८ कोटींचा झाला आहे, तर जीवन प्राधिकरणाला त्याचे शुल्क पावणे दोन कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. परिणामी पंधरा कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड नगरपालिकेवर बसला आहे.