शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
3
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
4
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
5
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
6
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
7
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
8
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
9
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
10
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
11
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
12
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
13
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
14
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
15
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
16
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
17
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
18
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
19
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

सन्मानाने आघाडी करा, नाही तर स्वबळावर लढू, ‘शेकाप’च्या जिल्हा बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:25 PM

धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असा निर्धार माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केला. याला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला.

ठळक मुद्दे सन्मानाने आघाडी करा, नाही तर स्वबळावर लढू, ‘शेकाप’च्या जिल्हा बैठकीत निर्णयविधानसभेच्या पाच जागांवर दावा

कोल्हापूर : धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असा निर्धार माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केला. याला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंबे रोडवरील शेकापच्या कार्यालयात रविवारी दुपारी जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा झाला. यात काँग्रेसप्रणित आघाडीत सहभागी होण्यासह स्वतंत्र लढण्याबाबतही चाचपणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो देवकर, प्राचार्य टी. एस. पाटील, भारत पाटील, अशोकराव पवार-पाटील, बाबूराव कदम, केरबा पाटील, निवास लाड, बाजार समिती संचालक अमित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासो देवकर म्हणाले, शेकाप सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलने उभारते, ती यशस्वीही करते; पण निवडणुकीच्या मैदानात मात्र यश मिळत नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. निवडणूक जिंकण्याच्याच दृष्टीने रणनीती आखली गेली पाहिजे. भारत पाटील यांनी शेकाप सध्या जिंकण्याच्या नसल्या तरी पाडण्याची भूमिका चांगली निभावू शकतो, याचे प्रत्यंतर यापूर्वीही आलेले आहे. त्यामुळे आघाडीत शेकापला सन्मान मिळावा, अशी भावना व्यक्त केली. केरबा जाधव, कुमार जाधव, सुभाष सावंत यांनी कार्यकर्ते हीच ‘शेकाप’ची ताकद असल्याने त्यांचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेससोबतचा पूर्वानुभव वाईट असल्याने त्याचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

करवीरसाठी आग्रह, शाहूवाडी-पन्हाळा लढण्याची तयारीपारंपरिक मतदारसंघ म्हणून करवीरवर ‘शेकाप’चाच पहिला हक्क आहे. आघाडीच्या जागावाटप बैठकीत करवीरसाठी आग्रह कायम असणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीने लढण्यास नकार दिला, तर अग्रहक्काने या जागेवर शेकापचाच विचार व्हावा, तसा उमेदवार आमच्याकडे आहे. तो योग्य वेळी बाहेर काढू, असे भारत पाटील यांनी सांगितले.बापूंकडे निर्णयाचे सर्वाधिकारदोन्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यासह जागावाटपासंदर्भात सर्वाधिकार संपतबापू पवार पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय मेळाव्यात झाला. ‘शेकाप’ने दावा केलेल्या पाचपैकी किमान दोन तरी जागा पदरात पाडून घ्याव्यात, असेही ठरले. तीन आॅगस्टपर्यंत हा निर्णय होणार असल्याने तत्पूर्वी तालुकानिहाय बैठका घेऊन सक्षम उमेदवारांचा शोध घेण्याचेही ठरले.‘शेकाप’ने दावा केलेले मतदारसंघकोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी-भुदरगड, शाहूवाडी-पन्हाळा.

 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण