शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

Ratnagiri-Nagpur Highway: 'त्या' ११ गावांना चौपट मोबदला रेडिरेकनर की बाजारभावानुसार..?, शेतकऱ्यांत संभ्रमावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:13 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाकडे लक्ष

संदीप बावचेजयसिंगपूर : नागपूर-रत्नागिरीमहामार्गासाठी सुरु असलेल्या भूसंपादनात बाजारभावाच्या चौपट मोबदला मिळाल्याशिवाय जमिनीची मोजणी करु देणार नाही. या भूमिकेवर चोकाक ते अंकली या अकरा गावांतील शेतकरी ठाम आहेत. या शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्यासाठी नवीन प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र हा मोबदला रेडिरेकनर की बाजारभावाच्या दराने मिळणार याबाबत शेतकऱ्यात संभ्रमावस्था आहे.सांगली-कोल्हापूरमहामार्गांतर्गत भूसंपादनाविरुद्ध शेतकऱ्यांनी २०१० पासून आवाज उठविण्यास सुरुवात केली होती. २०१२ ते २०१६ या कालावधीत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली. महामार्गाचे काम अपूर्ण असतानाच २०१८ ला सुप्रिम कंपनी आणि शासन यांच्यात वाद सुरु झाला. हा वाद संपुष्टात यायला दोन वर्षे लागली. याचदरम्यान २०१९ ला सांगली-कोल्हापूरचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाला.२०२१ ला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाली. २०२३ ला यासंदर्भात राजपत्र निघाले. त्यानुसार चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर, उमळवाड, उदगाव, अंकली या गावांतून जाणाऱ्या महामार्गावरील भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात झाली. शेतकऱ्यांकडून हरकती दाखल प्रक्रिया पूर्ण करावयाच्या आतच घाईगडबडीने प्राधिकरण विभागाने जमीन मोजणीला सुरुवात केली. त्यामुळे त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांचा विरोध आणि शासनाकडील तांत्रिक अडचणीमुळे जानेवारी २०२५ मध्ये नव्याने राजपत्र निघाले. पुन्हा शेतकऱ्यांना हरकती दाखल करण्याच्या सूचना देत मोजणीच्या नोटिसा काढल्या. या चुकीच्या कारवाईमुळे आंदोलन करीत मोजणी पुन्हा बंद पाडली.दरम्यान, चोकाक ते अंकली रस्त्यासाठी भूसंपादनासाठी गुणांक दोननुसार (चौपट भरपाई) भरपाई देण्याचा नवीन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा. तो केंद्राकडून तातडीने मंजूर करून घेऊ, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या दीड वर्षापासून चौपट भरपाईच्या मागणीसाठी आंदोलने केली. शासनाचेही लक्ष वेधले. महसूलमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आणि प्राधिकरण विभागाने तत्काळ प्रस्ताव सादर करावा. - विक्रम पाटील, अध्यक्ष, कृती समिती 

चौपट मोबदला हा रेडी रेकनरच्या की बाजारभावाच्या, हे निश्चित नाही. बाजारभावाच्या चौपट मोबदला घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. लढा सुरूच राहणार आहे. - उद्यानपंडित राजकुमार आडमुठे, तमदलगे

२०२१ ला निघालेल्या अधिसूचनेत बदल केल्याशिवाय चौपट मोबदला देण्याचे धोरण बदलता येणार नाही. जोपर्यंत चौपट मोबदला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्याबाबतचा अधिकृत आदेश निघत नाही, तोपर्यंत भारतीय किसान संघाच्या वतीने लढा सुरूच ठेवणार आहे. - चेतन खोंद्रे, उपाध्यक्ष, भारतीय किसान संघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गFarmerशेतकरीGovernmentसरकार