शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

मोजणी अन् नकाशात ११ वर्षे अडकली शेतजमीन

By admin | Updated: July 9, 2015 00:20 IST

शेतकरी हवालदिल : करवीर तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रताप

कोल्हापूर : करवीर तहसीलदार कार्यालय व करवीर भूमी अभिलेख कार्यालयाच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या भूमिकेमुळे शेतजमीनधारकांना हक्काची हद्द वाटून घेऊन नकाशाच्या किरकोळ कामासाठी गेल्या अकरा वर्षांपासून तिष्ठावे लागत आहे. कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावरील नंदवाळ गावच्या हद्दीतील पंधराहून अधिक जमीनधारकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही व्यथा यातील काहीजणांनी ‘लोकमत’च्या ‘हेल्पलाईन’कडे मांडली.नंदवाळ गावच्या हद्दीतील सुमारे ८० एकर शेतजमीन १९५६ मध्ये १९ शेतमजूर, माजी सैनिक, वहिवाटदार यांना ही जमीन मिळाली आहे. कागदोपत्री प्रत्येकाचे क्षेत्र आहे, परंतु प्रत्यक्षात मोजणी केल्यावर काही जणांना कागदावरील क्षेत्रापेक्षा कमी जमीन आल्याचे दिसून आले. २००४मध्ये झालेल्या या मोजणीनंतर भूमी अभिलेख कार्यालयाने जागेवर जाऊन हद्दी निश्चित करून त्यानुसार दगड लावून द्यावेत व नकाशा द्यावा, अशी मागणी संबंधितांनी केली आहे. यासंदर्भात अकरा वर्षांपासून वारंवार पाठपुरावाही सुरू आहे. भूमी अभिलेख कार्यालय म्हणते आम्हाला प्रथम करवीर तहसीलदार कार्यालयाकडून जमिनीची कब्जेपट्टी मिळायला हवी तर तहसीलदार कार्यालय म्हणते भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घ्यावी. दोघांच्याही चालढकलपणामुळे तक्रारदारांना त्रासाला सामोरे जागे लागत आहे. त्यातील एक तक्रारदार असणारे शेतजमीन मालक हे महसूल विभागातील मोठ्या पदावरील निवृत्त कर्मचारी आहेत, असे असूनही पुढील कार्यवाही करण्याचा शिष्टाचार करवीर तहसीलदार कार्यालयाने दाखविलेला नाही (प्रतिनिधी)