शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या पेंड आयातीच्या धोरणामुळेच सोयाबीनचा दर घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

कोल्हापूर : आपल्या देशात ज्या जीएम सोयाबीनच्या उत्पादनाला बंदी आहे, त्या सोयाबीनची पेंड आयात करण्याचे धोरण केंद्र सरकारने घेतले ...

कोल्हापूर : आपल्या देशात ज्या जीएम सोयाबीनच्या उत्पादनाला बंदी आहे, त्या सोयाबीनची पेंड आयात करण्याचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे. या धोरणामुळेच आपल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दर घसरला आहे. एकीकडे तेलबियांचे उत्पादन वाढावा असे सांगत दुसरीकडे आयातीबाबतचे असे धोरण सरकारने घेतले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी येथे सांगितले. साखर कारखान्यांनी ९५ टक्के एफआरपी दिली आहे. उर्वरित एफआरपीही लवकर देण्याबाबत कारखान्यांना सूचना केली आहे. पुढील हंगामात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकारकडून एफआरपीबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी वसतिगृह इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री भुसे कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अतिवृष्टी, महापुरामुळे शेती, शेतकऱ्यांची घरे, आदी स्वरूपात नुकसान झाले आहे. त्याबाबतचे पंचनामे पूर्ण होत आले आहेत. दोन आठवड्यांत गटनिहाय माहिती संकलित होईल. नुकसानभरपाईसाठी किती निधी लागेल याचा अंदाज येईल. त्यानुसार मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. पर्यावरणातील बदलांच्या अनुषंगाने आणि अतिवृष्टी, महापुरात टिकणारी कोणती पिके घेतली जातील यासंदर्भात चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. विद्यापीठांतील अभ्यासक्रम बदलाबाबत समिती नेमली असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. कोरोनाच्या कालावधीत राज्यात कुठेही अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध कमी पडले नाही. त्याचे सर्व श्रेय शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आहे. नावीन्यपूर्ण संशोधन, प्रयोग करणाऱ्या पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ आम्ही तयार केली असून, त्याद्वारे अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, महेश शिंदे उपस्थित होते.

कोल्हापुरातील ‘रामेती’साठी तीन कोटी

कोल्हापुरातील रामेती प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीसह अन्य प्रलंबित कामांसाठी शासनाने तीन कोटींचा निधी वर्ग केला आहे. येथील कृषी विभागाशी संबंधित सर्व विभाग एकाच छताखाली आणण्यासाठी कृषी भवनच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

मंत्री भुसे म्हणाले

१) काहीही न करता चंदगड येथील शिवमुद्रा शेती गटाने कृषी विभागाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान घेतल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई केली जाईल.

२) प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल.

३) कृषी विद्यापीठाच्या विभाजनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.

४) कोल्हापूरसह राज्यातील सर्व कृषी महाविद्यालये, विद्यापीठांतील जमिनींचे संरक्षण आणि कॅम्पस सुरक्षित केले जातील.