शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

इंचभरही जमीन बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही

By admin | Updated: May 14, 2015 00:33 IST

भूमी अधिग्रहण अध्यादेश हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरावे : नामदेव गावडे

देशात सध्या भूमी अधिग्रहण कायद्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षात जोरदार खडाजंगी सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी होऊ द्यायची नाही, यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने गुरुवारी (दि.१४) संपूर्ण राज्यभर आंदोलन हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर नेमका हा कायदा काय, एनडीए सरकारने तो सोयीनुसार कसा वाकवण्याचा प्रयत्न केला, याबाबत किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांच्याशी केलेली बातचीत...प्रश्न : भूमी अधिग्रहण कायद्यापूर्वी जमिनी कशा घेतल्या जात ?उत्तर : स्वातंत्र्यपूर्व इंग्रज सरकारने १८९४ ला केलेल्या कायद्यानुसार विकासात्मक कामांसाठीच जमिनी घेतल्या जात होत्या. विकासासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांची कधीच हरकत नव्हती आणि नाही.प्रश्न : जुन्या कायद्यांचाही गैरवापर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत?उत्तर : हे खरे आहे. स्वातंत्र्यांनतर इंग्रजांनी केलेल्या कायद्याचा हळू-हळू दुरूपयोग सुरू झाला. उद्योगाच्या नावाखाली सरकारी दराने वारेमाप जमिनी शेतकऱ्यांकडून घेतल्या. एक एकराची गरज असताना दोन हजार एकरांपर्यंत जमिनी उद्योगपतींनी ताब्यात घेतल्या. नुसत्या जमिनी घेतल्या नाहीत, तर सरकारच्या माध्यमातून वीज, पाणी, रस्ते, आदी सुविधांही घेतल्या; पण अनेक ठिकाणी ३०-४० वर्षे उद्योगच उभारले नाहीत. प्रश्न : या गैरवापरांबाबत कायद्यात काय तरतूद आहे काय?उत्तर : विकासकामांसाठी जमिनी घेताना त्या ठिकाणी तीन वर्षांत प्रकल्प उभा राहिला पाहिजे तसे न झाल्यास मूळ मालकास जमीन परत करण्याची तरतूद कायद्यात आहे; पण कायदा पाळणारी माणसे येथे आहेत का? प्रत्येकाने सोयीनुसार कायदा वाकविण्याचे काम केल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. याविरोधात देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला. त्यातून २००७ ला कायदा बदलण्याचा प्रयत्न झाला. २०१३ ला जमीन अधिग्रहण कायद्याला मान्यता देण्यात आली. प्रश्न : हा कायदा शेतकरी हिताचा होता का?उत्तर : निश्चित, कायदा करतानाच तज्ज्ञ समितीची स्थापना करून त्याद्वारे एखादी जमीन घेताना पर्यावरण, मानवी जीवन, शाळा यावर काही परिणाम होतो काय? याचा अभ्यास करण्यात आला. शासकीय प्रकल्पासाठी जमीन घेताना ७० टक्के शेतकऱ्यांची सहमती, तर खासगी प्रकल्पासाठी ८० टक्के शेतकऱ्यांची सहमती गरजेची आहे. त्याशिवाय ग्रामसभेची सहमती आवश्यक आहे. सिंचनाखालील, दुबार पिकांची जमीन घेता येणार नाही. प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींची विक्री झाली, तर त्या विक्रीतून झालेल्या नफ्यातील ४० टक्के हिस्सा संबंधित शेतकऱ्यांना द्यायचा, असा सर्वपक्षीय चांगला कायदा अस्तित्वात आला होता. प्रश्न : ‘एनडीए’ सरकारचा नवीन अध्यादेश काय आहे?उत्तर : या कायद्यातील सेक्शन २ व ३ हा मूळ गाभाच काढून टाकण्याचा प्रयत्न भाजप सरकारने सुरू केला आहे. सार्वजनिक हिताचे काम खासगी कंपन्या करत असतील, तर त्यांना जमीन घेण्यास मान्यता असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. नवीन स्मार्ट सिटी व कॉरिडॉर करण्यासाठी दुबार पिकांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा डाव आहे. प्रश्न : त्याचे दुष्परिणाम काय?उत्तर : यामुळे शहर व महामार्गांच्या अवती-भोवतीच्या सर्व जमिनी जाणार आहेत. या अध्यादेशामुळे एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के क्षेत्र बाधित होण्याचा धोका आहे. या देशाचा विकास झाला पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही, पण प्राथमिक गरज अन्नधान्य आहे. कारखान्यांतून अन्नधान्य पिकविता येणार नाही, त्यासाठी जमिनीच पाहिजेत. याचे भान एनडीए सरकारने ठेवावे. प्रश्न : यामागे एनडीए सरकारचे राजकारण आहे?उत्तर : निश्चितच, लोकसभा निवडणुकीत कॉर्पोरेट कंपन्या, बिल्डरांनी मदत केली. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळला आहे. विद्यमान लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन मागील समितीच्या अध्यक्षा होत्या. त्यांनीच सर्वपक्षीय एकमत होणाऱ्या ड्राफ्टला मान्यता दिली; पण सत्तेवर आल्यानंतर त्यांचीही भाषा बदलली. प्रश्न : शेतकरी विरोधी कायदा हाणून पाडण्यासाठी तुम्ही काय करणार?उत्तर : केंद्र सरकार राज्यसभेत अल्पमतात आहे, तरीही थंडा करके खाओ, यानुसार दोन्ही सभागृहात ते भविष्यात रेटण्याचा प्रयत्न करणारच. या कायद्याबाबत अजून शेतकऱ्यांमध्ये जागृती नाही, त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी ग्रामपंचायतींना भेटी देऊन कायद्याची दाहकता समजावून सांगत आहे. याविरोधात राज्यभर रस्ता रोको, रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. खरोखरंच विकास होणार असेल, तर जमिनी देण्यास आमचा विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात कोणी जमिनी घालण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो हाणून पाडू.- राजाराम लोंढे