शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

आसवणी प्रकल्पात पर्यावरण संतुलनाची खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या आसवणी प्रकल्प उभारणीच्या कामातील एक ...

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या आसवणी प्रकल्प उभारणीच्या कामातील एक महत्त्वाचा भाग म्हणून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून कारखाना कार्यस्थळावर गुरुवारी पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी आयोजित केली होती. यासाठी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रदूषण मंडळ कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, फिल्ड ऑफिसर संजय मोरे व नीलेश मारबळ आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

कारखानासभोवतालच्या हुपरी, यळगूड, रेंदाळ, जंगमवाडी, तळंदगे, रांगोळी, पट्टणकोडोली, इंगळी या गावांतील नागरिक, लोकप्रतिनिधी, महिला तसेच वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे या भागात होणाऱ्या सुधारणा तसेच प्रदूषणापासून कारखान्याने घेतलेली खबरदारी याबाबत नागरिकांनी माहिती जाणून घेतली. त्यांच्या सर्व शंकांचे कारखाना प्रशासनाकडून समाधानकारक निरसन करण्यात आले. या आसवनी प्रकल्पातील सांडपाण्याचा शंभर टक्के पुनर्वापर होणार आहे. सुमारे १२५ कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प असुन साधारणपणे ३३० दिवस हा प्रकल्प चालू राहणार आहे. यावेळी कारखाना कार्यस्थळावर पर्यावरणाच्या देखरेखीकरिता बसविलेल्या एन्व्हायरोन्मेंट मॉनेटरिंग डिस्प्ले युनिटचे उद्घाटन प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

मोलॅसिस किंवा उसाच्या रसापासून प्रतिदिन १०० केएलपीडी क्षमतेच्या आसवणी प्रकल्प उभारणीचे काम कारखाना व्यवस्थापनाने हाती घेतलेले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कागदपत्रांची पूर्तता, जागेची निश्चितता, नाणेनिधीची उपलब्धता याबरोबरच पर्यावरण संतुलनाविषयी पूर्ण खबरदारी कारखान्याने घेतलेली आहे. पर्यावरण संतुलनासाठी शासनाच्या आवाहनानुसार कारखाना मालकीच्या एकूण जागेच्या एक तृतीयांश म्हणजे ३३ टक्के जागेवर सुमारे ६२ हजार झाडांचे रोपण करून त्यांचे उत्तमरीत्या संगोपनही केलेले आहे. जवाहर कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे तंतोतंत पालन केल्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.

-------::------

फोटो ओळी - जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या आसवणी प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून कारखाना कार्यस्थळावर गुरुवारी पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी आयोजित केली होती. यासाठी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रदूषण मंडळ, कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, फिल्ड ऑफिसर संजय मोरे व नीलेश मारबळ आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.