शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणासाठी शिक्षण क्षेत्रही सोडले नाही

By admin | Updated: August 25, 2014 22:54 IST

नीती प्रधान : कुडाळ येथे आयोजित उच्च शिक्षणातील गुणवत्ता विषयावरील परिसंवादात व्यक्त केली खंत

कुडाळ : शिक्षण क्षेत्रातही राजकारण्यांनी राजकारण आणले आहे. राजकारणी शिक्षण क्षेत्रापासून दूर गेल्यास या क्षेत्रामध्ये नक्कीच सुधारणा होईल, असा आशावाद एसनडीटी विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. नीती प्रधान यांनी कुडाळ येथील बॅ. नाथ पै संस्थेमार्फत आयोजित केलेल्या ‘उच्च शिक्षणातील गुणवत्ता’ या राष्ट्रीय परिसंवादात व्यक्त केला. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी संपूर्ण योगदान देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्यावतीने महाविद्यालयात उच्च शिक्षणातील गुणवत्ता विषयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिक्षकांनी राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, गोव्याचे उपविभागीय अधिकारी जी. श्रीनिवास यांनी केले. यावेळी मुंबई येथील सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या डॉ. सत्यवती राऊळ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईचे डॉ. सुभाष वाघमारे, संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत, प्राध्यापक अल्ताफ खान, डॉ. सिध्दार्थ खाटविसावे, प्राचार्य फ्रान्सिस डिसोजा, प्राचार्य डॉ. दीपाली काजरेकर, प्राध्यापक जयवंती सावंत, अमृता गाळवणकर आदी उपस्थित होते. डॉ. प्रधान म्हणाल्या, गरजेनुसार अभ्यासक्रमात वारंवार बदल झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर आणि धाकही असावा. खासगी शिक्षण संस्थांमध्ये बऱ्याचवेळा गोंधळाचा कारभार सुरू असतो. परंतु खासगी शिक्षण संस्थांशिवाय सरकारकडे अन्य पर्यायही उपलब्ध नाही, असे सांगितले. डॉ. श्रीनिवासन यांनी, वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वसामान्यांना शैक्षणिक सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत असून याला सध्याची शिक्षणपध्दती जबाबदार आहे, असे सांगितले. परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलांना जेवढा खर्च येतो, त्या खर्चात देशात सुसज्ज अशी सातं आयटी महाविद्यालये निर्माण होऊ शकतील, अशी टीका सध्याच्या शिक्षणपध्दतीवर त्यांनी केली. यावेळी उमेश गाळवणकर, डॉ. वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)युवा पिढी पळतेय पैशामागेसध्याची युवा पिढी पैसे कमवायच्या मागे असून यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करीत आहे. कष्टाने पैसे मिळतात. त्यामुळे लोभाने पैसे मिळविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन डॉ. प्रधान यांनी यावेळी केले.याला शिक्षकच जबाबदारसमाजाच्या सद्यस्थितीला सध्याच्या शिक्षणपध्दतीबरोबरच काही प्रमाणात शिक्षकही जबाबदार आहेत. नोकरी मिळण्याच्या अगोदर आपल्याला पगार किती मिळणार, याची कल्पना असूनही अवास्तव कारणांसाठी शिक्षक संपावर जातात, हे योग्य की अयोग्य ते त्यांनीच ठरवावे, असे डॉ. प्रधान यांनी सांगितले.